आम्ही एकत्र आल्यानंतर कुस्ती करणार की गाण्याचा कार्यक्रम करणार? का म्हणाले देवेंद्र फडणवीस असे?


पुणे- पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. मात्र, या सोहळ्याला अजित पवार आणि देवेंद फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार म्हटल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते तर याची चर्चा माध्यमांमध्येही रंगली होती.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाकयुद्ध सुरु आहे. अनेकवेळेला अगदी वैयक्तिक स्तरावर टीकाटिप्पणी हे नेते एकमेकांवर करत असल्याचे गेल्या काही  दिवसांपासून अनुभवायला मिळाले आहे. राज्यात नाट्यमयरित्या झालेल्या सत्तातरानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. दोघेही एका व्यासपीठावर येणार म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.

अधिक वाचा  पुणे शहर युवक काँग्रेस चिटणीसपदी यश गोरडे यांची नियुक्ती

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतला सुरुवातच अजितदादा आणि फडणवीस एकत्र येण्याच्या मिडियातील चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त करून केली. आम्ही एकत्र येणार याची लोकांपेक्षा जास्त उत्कंटा मिडियालाच आहे. दोन दिवस अगोदर तर दोन दिवस नंतर याची चर्चा सुरु  असते. आम्ही एकत्र आल्यानंतर कुस्ती करणार की गाण्याचा कार्यक्रम करणार? असा सवाल करत दादा मिडियाला बातम्या मिळाव्यात म्हणून आपण सारखं एकत्र आले पाहिजे. एक तर तुम्ही मला चहाला बोलवत जा, नाहीतर माझ्याकडे चहाला येत जा असे सांगत विकासाची कामे आणि शहराची कामे असतील तर सर्वांनी एकत्र येऊन पुढे जायचे असते असे फडणवीस म्हणाले.

अजित दादांनीही रोज त्याच त्याच बातम्या देऊन नवीन बातम्या नाही मिळाल्या नाही की मिडिया अशा बातम्या देतात असे नमूद केले. तर हातात हात घालून काम मूलभूत गरजांच्या बाबतीत एकत्र येऊन विचार होणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love