ईडीमार्फत नोटिसा पाठवायच्या हेच भाजपचे सध्याचे धोरण : जयंत पाटील

राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे
राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे

पुणे–केंद्र सरकारविरोधात जे बोलतात, त्यांना ईडीमार्फत नोटिसा पाठवायच्या आणि उपद्रव वा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा, हेच भाजपाचे सध्याचे धोरण असल्याची टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे केली.

पुण्यातील एका कार्यक्रमासाठी पाटील पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, विरोधात बोलणाऱयांना जाणीवपूर्वक त्रास देणे, हा भाजपाच्या धोरणाचाच एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. अशी कितीतरी उदाहरणे आत्तापर्यंत सापडतील. एव्हाना सगळय़ा देशाला हे कळून चुकले आहे. मात्र, चौकशीअंती यातून काहीही निष्पन्न होणार नाही आणि काही साध्यदेखील होणार नाही.

अधिक वाचा  Pune Municipal Corporation Election : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 'महाविकास आघाडी' म्हणूनच लढणार :अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही

चंद्रकांतदादांविषयी शक्यतो बोलत नाही

भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी विविध मार्गाने दबाव आणला जात असल्याच्या संजय राऊत यांच्या विधानासही त्यांनी दुजोरा दिला. ज्या अर्थी राऊत हे म्हणत आहेत, त्या अर्थी ते खरेच आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपाच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित केली. मात्र, चंदकांतदादांबद्दल कोणतेही विधान करण्यास त्यांनी नकार दिला. मी. चंद्रकांतदादांबद्दल काहीही बोलणार नाही. त्यांच्याविषयी मी शक्यतो बोलत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love