केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे – राजेश टोपे


पुणे-देशात कोरोनाचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशाच्या दहा टक्के जनता महाराष्ट्रात आहे अशा स्थितीत केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे संचालक मंडळाच्या बैठकीसाठी राजेश टोपे उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, राज्यातील कोरोनाची परिस्थिती संपूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असून दोन तीन जिल्हे सोडले तर पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे.  आपण स्वतः राज्यात फिरतो आहोत आणि ही  परिस्थिती नियंत्रणात येईल असे टोपे म्हणाले.

लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले, राज्याला लसीचे झुकते माफ मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत राहायची. दिवसाला दहा लाख लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे, आता 21 तारखेपासून लसीकरण केंद्र सुरू करणार आहे. राज्यात ही मोहीम जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे टोपे म्हणाले. देशात कोरोनाचा सर्वात ज्यास्त फटका महाराष्ट्राला बसला तसेच देशाच्या दहा टक्के जनता महाराष्ट्रात आहे अशा स्थितीत केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे असे टोपे म्हणाले,.

अधिक वाचा  जून नंतर लसीचा तुटवडा संपेल - देवेंद्र फडणवीस

राज्यात आता पर्यत अडीच ते 3 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. आणखी 13 डोस महाराष्ट्राला आवश्यक आहेत, हे सर्व काम पुढच्या 4 ते 5 महिन्यात संपवायचे आहे त्यासाठी केंद्राच्या सहकार्याची गरज आहे असे राजेश टोपे म्हणाले. म्युकर म्युकोसिस बाबत बोलताना, रुग्णांनी सरकारी रुग्णालयातच उपचार घ्यावे, तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तसेच यावर आवश्यक इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, खासगी रुग्णलयात उपचार घ्यायचे असतील तर तिथे  सुद्धा राज्य सरकारने कॅपिंग केलेली आहे. त्याठिकाणी आवश्यकते पेक्षा जास्त पैसे देऊ नये, तसेच कुठल्याही खासगी हॉस्पिटलने तसं करू नये असे टोपे म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love