संजय राठोड चुकले असतील तर कारवाई झालीच पाहिजे- राजू शेट्टी

राजकारण
Spread the love

पुणे—सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवले पाहिजे यश माझी स्पष्ट भूमिका आहे. हा फुले, शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथे स्रीयांचा सन्मान झालाच पाहिजे असे सांगत खरोखरच संजय राठोड चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

पुण्यामध्ये एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, एखाद्या महिलेबाबत कमी जास्त काही घडलं असे तर त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि त्याला कोणाचाही विरोध असता कामा नये मात्र, यापूर्वीच्या सरकारच्या काळात मंत्र्यांवर असेच झाले होते. ते राठोडांचा राजीनामा मागतात त्यावेळी आधीच्या सरकारच्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यावर त्यांची भूमिका वेगळी भूमिका वेगळी का होती? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी याचे उत्तर आधी द्यावे, ‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडं मारू नये’ असा टोला शेट्टी यांनी भाजपला लगावला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *