बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे—बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने पुण्यातील कोथरूड भागातील निखिल नाईक या विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घडली आहे.

आज बारावीचा निकाल असल्याने राज्यातील बारावीचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून उत्सुक होते, आज त्यांची उत्सुकता संपली. पुण्यातील निखिल नाईकचाही आज बारावीचा ऑनलाइन निकाल होता. या ऑनलाइन निकाल पत्रिकेत त्याला नापास झाल्याचे समजताच मोठा धक्का बसला. त्यामुळे निखिलने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन उडी मारत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

मिळालेल्या महितीनुसार, निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खूपच उत्सुक होता. दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजले. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. ताण-तणावात त्याने इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारली. त्यावेळी खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे यांच्या अंगावर पडला.यामध्ये लोणारे गंभीर जखमी झाले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला. लोणारे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निखिलला क्रिकेटची आवड असलेल्या शरीर सृदृढ ठेवण्यासाठी व्यायाम सुरू केला होता. तो शांत स्वभावाचा होता. निखिलचे वडील आचारीचे काम करतात. तर आई आजूबाजूच्या लोकांच्या घरात जाऊन घरकाम करते. मोठ्या कष्टाने मुलगा निखिलला शिक्षण ते देत होते. मात्र, निखिलच्या जाण्यामुळे त्याच्या आई वडिलांना जबर धक्का बसला आहे. निखिलच्या जाण्यामुळे पुण्यातील श्रावणधारा वसाहतीमधील महिलांनी दुःख व्यक्त केले. सुरूवातील झोपडपट्टी असलेल्या या जागेत आता चौदा मजली इमारत उभी राहिली आहे. कष्टकरी कुटुंबातील आशेचा किरण असलेला तरूण मुलगा गेल्याने परिसरातील सर्वच महिलांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *