शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : काय म्हणाला होता शरजील?

राजकारण
Spread the love

पुणे -पुण्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा Sharjeel Usman should be charged with treason आणि वादग्रस्त एल्गार परिषद आयोजित करणार्‍या आयोजकांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव‘ जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

या संदर्भात शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर, तक्रारदार ऍड प्रदीप गावडे उपस्थित होते.

मुळीक पुढे म्हणाले, ‘सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पालघर येथे हिंदू साधुंची हत्या, सावरकरांचा अवमान, हिंदूंना जाणीवपूर्वक सापत्न वागणूक देणे असे प्रकार घडले आहेत. याबाबत शिवसेना मूग गिळून बसली आहे. शरजील उस्मानी सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या व्यक्तिने राज्यात येऊन हिंदूचा अवमान करणारी वक्तव्ये केल्यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना आहे. चार दिवस उलटून गेल्यावरही उस्मानीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मान शरमेने खाली गेली आहे. शासनाने तातडीने पावले उचलून उस्मानी आणि एल्गार परिषदेचे आयोजन करणार्‍या संस्थांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा तीव‘ जनआंदोलन केले जाईल.’

महापौर मोहोळ म्हणाले, ‘शरजिल उस्मानी यांनी भारतीय संघराज्य आणि हिंदूंच्या विरोधात अतिशय आपत्तीजनक आणि भडकावू विधाने केली आहेत. भारतीय संघराज्याला न जुमानन्याचा हा प्रकार अतिशय गंभीर आहे. हा एकप्रकारे भारतीय संघराज्यावरील हल्ला आहे. शरजील केवळ हिंदू समाजाबद्दल बोलला नाही तर भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ, पोलीस आणि प्रशासकीय व्यवस्थेचा अपमान केला आहे. पोलीसांनी उस्मानीवर आणि एल्गार परिषदेचे आयोजन करणार्‍या संस्थेवर तातडीने कारवाई करावी.’

माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले, ‘पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद आयोजित केली होती. याचे आयोजनात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचा हात होता. शरजीलवर यापूर्वी हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. तरीही त्याला यावर्षी परिषदेत निमंत्रित करण्यात आले. त्याने अतिशय आक्षेपार्ह विधाने केली आहेत. तसेच परिषदेच्या ठिकाणी खोटा इतिहास, जातीय तेढ निर्माण करणारी, महापुरूषांचा अवमान करणारे साहित्य असणारी पुस्तककांची विक्री करण्यात आली. याचा सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.’

काय म्हणाला होता शर्जील उस्मानी त्याच्या भाषणात?

30 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठातील तरुण शर्जील उस्मानी याने भाषण देताना भारतीय संघराज्य विरोधात व हिंदू समाजाविरोधात आपत्तीजनक व भडकाऊ विधान केले होते. शर्जील उस्मानी याने आपल्या भाषणात ” आज का हिंदू समाज, हिंदुस्तान मे हिंदू समाज पुरी तरहा से सड चुका है, ये जो लोग लिंचिंग करते है, कत्तल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नई तरीके से हाथ धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे, क्या करते है लोग की वापस आ कर हमारे बीच खाना खाते है, उठते बैठते है, फिल्म देखते है, अगले दिन फिर किसी को पकडते, फिर कत्तल करते है और नॉर्मल लाईफ जीते है. अपने घर मे मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर मे पूजा भी कर रहे है, फिर बाहर कर यही करते है” अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.

शर्जील उस्मानीच्या या वक्तव्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या, भारतीय न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवला, भारतीय संघराज्याचा अवमान केला म्हणून त्याच्याविरोधात कलम 153 (अ) अंतर्गत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा किरकोळ गुन्हा दाखल न करता त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *