gtag('js', new Date());
पुणे: पुणे शहरात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विविध सखल भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने पावले उचलत शहरातील बाधित क्षेत्रातील २६० कुटुंबांमधील एकूण १०४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पुणे महानगरपालिकेच्या 'आयसीसीसी' (ICCC) प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेल्या वेदर स्टेशन्सच्या आकडेवारीनुसार, शहरात सरासरी ५३ मि.मी. ते...
पुणे: पुणे-लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून, त्यांना अमली पदार्थांच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहा अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणवेशातील या गुन्हेगारांनी चार पर्यटकांचे अपहरण करून त्यांना तब्बल सात तास बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले होते, मात्र एका तरुणाने आपल्या 'स्मार्ट वॉच'चा कौशल्याने वापर करून मदतीचा...
राम मंदिर ट्रस्ट कृष्ण मोहन नियुक्ती
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रशासकीय भूकंप झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टी अनिल मिश्रा यांची सत्ता संपुष्टात आली आहे. ट्रस्टने या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांच्या जागी आता भारतीय वन सेवेतील (IFS) निवृत्त अधिकारी कृष्ण मोहन यांची 'कार्यवाहक सरचिटणीस' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....
पाटण गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना; तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू
पुणे(प्रतिनिधी)-पुणे जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पाटण गावावर सोमवारी पाहते निसर्गाचा भीषण प्रकोप झाला. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत नंदू तिकोणे यांचे घर डोंगरावरून आलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडले गेले.या भीषण दुर्घटनेत तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये नंदू तिकोणे...
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास राजीनामा (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust Resignation)
अयोध्या: श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, न्यासाने तो स्वीकारला आहे. रामललाच्या दरबारात दानपेटीतील (हुंडी) रकमेच्या मोजणीवेळी झालेल्या चोरीच्या प्रकरणामुळे व्यथित होऊन त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या जागी आता कृष्ण मोहनजी यांची 'अंतरिम महामंत्री' म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने न्यासाचे कामकाज...
आषाढी वारी सुरक्षितता आवाहन
पुणे(प्रतिनिधी)--: राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या निर्माण झालेली पूर परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाकडून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून देहू आणि आळंदी परिसरात वाहतुकीसह...