gtag('js', new Date());
पुणे--किवळे येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 9 लाख 65 हजार 175 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.अमोल नारायण आडाल (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली), अल्ताफ पाषा तांबोळी (वय 40, रा. कोंढवा बु. पुणे), नईम रफिक शेख (वय 30, रा. थेरगाव), पुरुषोत्तम...
पुणे --आज दि. २९ ऑक्टो रोजी अभाविपच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेत झालेल्या गोंधळाबाबत जोरदार घोषणाबाजी करत 'पुंगी बजाव' आंदोलन करण्यात आले.परीक्षा पार पडत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाच्या सिस्टीम मधून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा क्रिमिनल जस्टिस विषयाचा पेपर गायब झालेला आहे, अनेक...
पुणे-काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांच्या पतीने त्याच्या लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसामध्ये मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून, त्याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.जयंत रजपूत (रा. खजिनाविहार) असे आत्महत्या केलेल्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मित गुन्ह्याची नोंद करण्यात...
पुणे- गेल्या आठ दिवसांपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेऊन बेपत्ता झालेले पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांनी घर का सोडले याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाषाणकर एका बड्या राजकीय नेत्याच्या  जवळच्या व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे घर सोडून गेल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.मागील बुधवारी गौतम पाषाणकर अचानक...
पुणे -शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना रक्तदाब वाढून अस्वस्थ वाटू लागल्याने येथील दीनानाथ हॉस्पिटल च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा निर्वाळा निकटवर्तीयांनी दिला आहे.   याबाबत माजी खासदार शेट्टी यांचे स्विय सहाय्यक स्वतिक पाटील यांनी पुढाकार घेऊन निवेदन केले आहे. यामध्ये म्हटले आहे की,...
मुंबई-कांद्याचा साठा करण्यावरील निर्बंधांच्या विरोधात नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी बंद घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा विक्रीविना पडून आहे तसेच ग्राहकांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांसाठी कांदा साठवणीची मर्यादा सध्याच्या २५ टनावरून वाढवून १०० टन करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय...