शरद पोंक्षे यांच्यामध्ये नथुराम गोडसे यांचा अतिरेकी डीएनए आला आहे का? – गोपाळदादा तिवारी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे— अभिनेते शरद पोंक्षे हे नथुराम गोडसे यांची भूमिका करता करता त्यांच्या प्रवृत्तीचा अतिरेकी डीएनए देखील पोंक्षेमध्ये आला आहे का? असा खोचक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे. ‘शालेय विद्यार्थ्यां समोर’ वापरलेली दहशतीची भाषा ही निंदनीय असून  दहशतीचे संस्कार देणाऱ्या अभिनेता शरद पोंक्षे यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे असेही तिवारी म्हणाले.

कॉँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पुणे शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, सचिन आडेकर व इतर यावेळी उपस्थित होते.

तिवारी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ‘डेक्कन एज्यु सोसायटीच्याच्या मा. स. गोळवलकर प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या’ स्वातंत्र्य सेनानी वि. दा.  सावरकरांवरील कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते  शरद पोंक्षे यांनी “सावरकरांची दहशत वाढली पाहीजे” असे ऊदगार काढून काँग्रेस नेतृत्वा विषयी टोमणे मारत अपमानकारक मुक्ताफळे ऊधळली.

सावरकरांची दहशद का वाढली पाहिजे?  त्याशिवाय त्यांना लोकमान्यता वा बहूमान्यता मिळणार नाही का? हे सतत जाणवते आहे काय? असे प्रश्न तिवारी यांनी उपस्थित केले. तर अभिनेता शरद पोंक्षे हे नथुराम गोडसे याची भूमिका करता करता त्यांच्या प्रवृत्तीचा अतिरेकी डीएनए देखील पोंक्षेमध्ये आला आहे का? असा खोचक सवाल देखील तिवारी यांनी केला.

दहशदवादी विचारसरणी मुळात ‘फॅसिस्ट विचारसरणीची’ द्योतक आहे आणि त्याच विचारसणीतून सावरकर थोपवू पाहत आहात का? असे संबोधून, एकेकाळच्या हिंदू महासभेच्या वि. दा. सावरकरांचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय व कशा प्रकारचे नाते संबंध होते, याचा इतिहास साक्ष आहे. सावरकरांच्या राष्ट्रीय संघर्षाविषयी आमचं दुमत नाही. त्यांचे स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदीराजींनीच काढले होते. मात्र, भाजपने सावरकरांसाठी काय केले? असा सवालही गोपाळ तिवारी यांनी केला आहे.

 शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे हे म्हणाले की, “एक व्यावसायिक नाटककाराने आपल्या वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन केले असुन, आपल्या मुलीस मात्र शिक्षणासाठी परदेशात पाठवतो आणि इथल्या बहुजन पोरांना सावरकरांची दहशत दाखवायला सांगतो” या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.

सावरकरांचा इंग्रजांप्रती माफीनामा व नेहरू गांधी घराण्याचे त्याग व योगदान ही तुलनाच होऊ शकत नसल्याने पोंक्षे यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल वापरलेले शब्द मागे घेतले नाही तर त्यांना पुण्यात कार्यक्रम करताना काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल. व्यवसायिक नाटकाराने आपली सीमा ओळखावी आणि नाही त्या भानगडीत पडू नये येणाऱ्या काळात आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. आता आम्हाला जास्त बोलायला लावू नका आम्ही जर बोलायला लागतो तर सगळी चिरफाड करू मग माफीविरापासून आजपर्यंत सगळं बाहेर निघेल असा इशारा अरविंद शिंदे यांनी शरद पोंक्षे यांना दिला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *