पुणे मावळ: पाटण गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना; तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पाटण गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना; तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू
पाटण गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना; तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे(प्रतिनिधी)-पुणे जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पाटण गावावर सोमवारी पाहते निसर्गाचा भीषण प्रकोप झाला. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत नंदू तिकोणे यांचे घर डोंगरावरून आलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडले गेले.

या भीषण दुर्घटनेत तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये नंदू तिकोणे (वय ६०), माऊली तिकोणे (वय ३०) आणि अनिता तिकोणे (वय ५५) यांचा समावेश आहे . कुटुंबातील एका महिलेचा शोध सोमवारी संध्याकाळपर्यंत  सरू होता. प्रशासनाने सुमारे २३ ते ३५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.

स्फोटासारखा आवाज आणि घर गायब

अधिक वाचा  #Srimad Bhagavad Gita and Journalism : राष्ट्राची वीण घट्ट होईल, असे वार्तांकन गरजेचे : डॉ. मनमोहन वैद्य

ही भीषण दुर्घटना सोमवारी पहाटे ४ ते ४:३० च्या सुमारास घडली. लोणावळा आणि मावळ परिसरात अतिवृष्टी होत असल्याने विसापूर किल्ल्याच्या डोंगरकडाचा काही भाग अचानक खचला. नंदू तिकोणे यांच्या शेजारी राहणारे प्रत्यक्षदर्शी अक्षय भोसले या घटनेचा थरार सांगताना म्हणाले की, “पहाटे ४ वाजेपर्यंत तिकोणे यांचे घर व्यवस्थित दिसत होते, मात्र ४ वाजून ५ मिनिटांनी अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर पाहिले तर तिकोणे यांचे घर गायब झाले होते”. किल्ल्यावरून खाली आलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याने तिकोणे यांच्या घराचा अक्षरशः घास घेतला. तिकोणे यांच्या शेजारी राहणाऱ्या पंकज तिकोणे यांच्या घरात रात्री १५ सदस्य होते, सुदैवाने ते बचावले असले तरी या घटनेने गावकरी सुन्न झाले आहेत.

अधिक वाचा  सिंहगड रस्त्यावर महापालिकेची मोठी कारवाई; ५० हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त

मृतदेहांचा ढिगारा आणि शोधकार्य

या दुर्घटनेत नंदू तिकोणे, माऊली तिकोणे आणि अनिता तिकोणे या तिघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबातील चौथ्या महिलेचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ  आणि स्थानिक प्रशासनाकडून सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. दरडीच्या तडाख्यात तिकोणे यांच्या घरासह सुमारे चार घरे आली होती, ज्यामध्ये अडकलेल्या अन्य ३० ते ३५ जणांना सुदैवाने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मदतीला विलंब

बचावकार्यादरम्यान प्रशासकीय त्रुटींवरून गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवकालीन वारसा असलेल्या या गावाकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मदतीसाठी निघालेल्या बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला. अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी बचाव पथकाला अडीच तास लागले, असा दावा गावकऱ्यांनी केला असून खराब रस्त्यांमुळे मदत वेळेत पोहोचली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  सशस्त्र नक्षलवाद संपला, आता 'वैचारिक आणि शहरी नक्षलवादा'चे मोठे आव्हान; पुण्यात तज्ज्ञांनी मांडले परखड विचार

घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बचावकार्याचा आढावा घेतला असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे. लोणावळा परिसरात २४ तासांत ६७० मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून प्रशासनाने पुढील काही दिवस नागरिकांना विशेषतः डोंगरदऱ्यातील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आह.   आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत [४४].

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love