अयोध्या राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठे फेरबदल: चंपत राय यांचा राजीनामा, दानपेटी चोरी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास राजीनामा (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust Resignation)
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास राजीनामा (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust Resignation)

अयोध्या: श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, न्यासाने तो स्वीकारला आहे. रामललाच्या दरबारात दानपेटीतील (हुंडी) रकमेच्या मोजणीवेळी झालेल्या चोरीच्या प्रकरणामुळे व्यथित होऊन त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या जागी आता कृष्ण मोहनजी यांची ‘अंतरिम महामंत्री’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने न्यासाचे कामकाज पाहतील, अशी घोषणा न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी केली. दरम्यान, “कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नाही, केवळ खोटी माहिती पसरवून हिंदू समाजात फूट पाडण्याचा हा कट आहे,” असा आरोप त्यांनी केला. ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवल्या तेच आज रामभक्तीचा मुखवटा घालून गोंधळ घालत आहेत असेही ते म्हणाले.

अयोध्या येथे ११ जुलै रोजी होणारी न्यासाची नियोजित बैठक एका ‘असाधारण परिस्थिती’ मुळे तातडीने ६ जुलै रोजीच घेण्यात आली. या बैठकीला अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दासजी महाराज, पेजावर श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज, युगपुरुष परमानंदजी महाराज, अयोध्या जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी आणि ९९ वर्षीय कायदेतज्ज्ञ के. पराशरण (ऑनलाईन) यांच्यासह महत्त्वाचे विश्वस्त उपस्थित होते. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि असंख्य रामभक्तांच्या बलिदानानंतर उभ्या राहिलेल्या भव्य मंदिरात दानपात्रातील चढावा चोरीला जाणे ही बाब अत्यंत लज्जास्पद आणि वेदनादायक आहे, असे मत स्वामी गोविंद गिरी यांनी व्यक्त केले. चोरीचे स्वरूप किती मोठे होते यापेक्षा अशा पवित्र स्थळी असे कृत्य होणे हीच न्यासासाठी आघाताची गोष्ट ठरली असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा  आपआपसातील दुही संपवण्यासाठी राम मंदिर निर्मिती महत्वाची -आचार्य गोविंद देवगिरी महाराज

या प्रकरणावर भाष्य करताना स्वामीजींनी सांगितले की, जोपर्यंत या चोरीतील गुन्हेगार पकडले जात नाहीत आणि त्यांना कठोर शासन होत नाही, तोपर्यंत पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, अशी भावना चंपत राय यांनी व्यक्त केली होती. न्यासाचे मार्गदर्शक के. पराशरण यांनी न्यासाच्या संविधानाचा दाखला देत स्पष्ट केले की, नियमानुसार राजीनामा दिल्यास तो तात्काळ स्वीकृत मानला जातो, त्यामुळे न्यासाकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. चंपत राय यांनी राम मंदिर आंदोलनाच्या सुरुवातीपासून, जेव्हा कोणतीही हालचाल नव्हती, तेव्हापासून दिलेल्या योगदानाचे न्यासाने कौतुक केले असून त्यांच्या पारदर्शक भूमिकेचा सन्मान करत हा राजीनामा मान्य केला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांमध्ये मंदिरातील मौल्यवान वस्तू गायब झाल्याच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावरून स्वामीजींनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, न्यासाकडे एकूण २८०० वस्तूंचा अधिकृत रजिस्टर उपलब्ध असून सर्व वस्तू पूर्णपणे सुरक्षित आहेत. अफवांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी रामायणाचे हस्तलिखित पुस्तक, काकभुशुंडी जींची मूर्ती, गळ्यातील मौल्यवान हार आणि पादुका यांसारख्या वस्तूंचे नमुने प्रत्यक्ष माध्यमांसमोर सादर केले. “कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नाही, केवळ खोटी माहिती पसरवून हिंदू समाजात फूट पाडण्याचा हा कट आहे,” असा इशारा त्यांनी दिला.

अधिक वाचा  राम मंदिरासाठी महिलेने केला तब्बल २८ वर्षे उपवास

ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवल्या तेच आज रामभक्तीचा मुखवटा घालून गोंधळ घालत आहेत

भविष्यातील कामात पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी न्यासाने काही विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. २२ जुलै रोजी पुन्हा एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्या वेळी एसआयटीचा (SIT) अंतिम अहवाल समोर येण्याची शक्यता आहे. स्वामी गोविंद गिरी यांनी भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अशा प्रपंचावर विश्वास ठेवू नये. ज्यांना शंका आहे त्यांनी थेट न्यासाच्या कार्यालयात येऊन खात्री करावी, न्यास सर्व उत्तरे देण्यास बांधील आहे. “ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवल्या आणि रामाचे अस्तित्व नाकारले, तेच आज रामभक्तीचा मुखवटा घालून गोंधळ घालत आहेत,” अशी टीका करत त्यांनी सर्व रामभक्तांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. न्यायालये आणि चौकशी यंत्रणांवर विश्वास असून गुन्हेगारांना अद्दल घडवली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love