देशात आणीबाणी लावणं चूक होती – राहुल गांधी यांची कबुली

राजकारण
Spread the love

दिल्ली(ऑनलाइन टीम)—दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ दरम्यान २१ महिने आणीबाणी लावली होती. त्यानंतर देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध देशात सर्व विरोधी राजकीय पक्षांबरोबरच सर्वच क्षेत्रात संताप व्यक्त केला होता आणि देशात मोठे जनआंदोलन झाले होते. त्यामुळे त्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. २४ जानेवारी १९७८ रोजी महाराष्ट्रातील एका रॅलीत इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादल्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती. आता त्यांचे नातू कॉँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनीही आणीबाणी लावणं चुकीचं होतं असं म्हटलं आहे. मात्र, हे सांगतानाच त्यांनी कॉँग्रेसने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही असेही म्हटले आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, देशात आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं तेदेखील चुकीचं होतं. आणीबाणी चुकीची होती असे सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळं आहे अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.आणीबाणीच्या काळात जे काही झालं आणि सध्या जे काही सुरु आहे त्यात मुलभूत फरक आहे. काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी आपल्याला परवानगीदेखील नाही. आपली इच्छा असली तरी आपण करु शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.याआधी २०१९ लोकसभा निवडणुकीतदेखील राहुल गांधींनी एका मुलाखतीत आणीबाणी चुकीची होती सांगत माफी मागितली होती.

“देशात स्वतंत्रपणे कार्य करणार्‍या संस्थांमध्ये संस्थात्मक समतोल राखला जात असल्यानेच आधुनिक लोकशाही कार्य करतात. भारतात त्या स्वातंत्र्यावरच हल्ला केला जात आहे. आरएसएस नावाची एक मोठी संस्था इतर सर्व संस्थांमध्ये प्रवेश करत आहे. हल्ला होत नाही अशी एकही संस्था नाही आणि हे अत्यंत पद्दतशीरपणे सुरु आहे,” अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

“न्यायव्यवस्था, प्रेस, प्रशासकीय सेवा, निवडणूक आयोग अशा प्रत्येक संस्थेत अत्यंत पद्दतशीरपणे एक विशिष्ट विचारसरणी असणाऱ्या आणि एका ठराविक संस्थेच्या लोकांनी भरली जात आहे,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *