कॉंग्रेसच्या २३ जेष्ठ नेत्यांचा ‘लेटर बॉम्ब’ कशासाठी? कोण होणार कॉंग्रेसचा अध्यक्ष?

राजकारण
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—उद्या( सोमवारी) कॉंग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून श्रीमती सोनिया गांधी यांना या पदावर एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक महत्वपूर्ण असून या बैठकीच्या पूर्व संध्येला अनेक चर्चांना उधाण आले आहे.

बैठकीपूर्वी कॉंग्रेसचे अनेक नेते आणि माजी मंत्र्यांसह २३ जणांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात बदल करण्याची तसेच अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली असल्याचे वृत्त आहे. या ‘लेटर बॉम्ब’मुळे सोनिया गांधी यांना अत्यंत दु: ख झाले असल्याचे  तर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी अत्यंत चिडले असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांच्यासह अनेक नेत्यांनी अशा आपत्कालीन परिस्थितीत सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर पूर्ण पूर्ण विश्वास असल्याचे ट्विट केले आहे. दुसरीकडे, नेहरू गांधी घराण्याचे अत्यंत जुने निष्ठावंत असलेल्या कॉंग्रेसच्या म्हण्यानुसार, ज्यांनी पत्र लिहिले आहे त्यांना 300 हून अधिक छोट्या आणि बड्या नेत्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या आहेत. परंतु पक्षात फुट पडण्याचा धोका होऊ नये म्हणून केवळ 23 नावे जाहीर केली आहेत. राहुल यांच्या निकटवर्तीयांचा असा विश्वास आहे की हा लेटर बॉम्ब काढून दबाव टाकण्यात आला आहे कारण सोमवारी कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांचे उत्तराधिकारी म्हणून गैर-गांधी अध्यक्ष बनविण्याची चर्चा सुरू झाली तर राहुल गांधी यांच्या पसंतीच्या व्यक्तीची निवड होण्यापासून रोखले जावे.

त्याचबरोबर, भविष्यातील कोणत्याही फेरबदलामध्ये त्यांची काळजी घेतली जावी यासाठी या नेत्यांनी  दबाव निर्माण केला असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसच्या सूत्रांकडून असेही सांगितले जात आहे की,    हे पत्र माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी तयार केले आहे आणि ते माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि वीरप्पा मोईली यांनी देखील पाहिले आहे आणि त्याला मान्यता दिली आहे. हे पत्र नवी दिल्लीच्या सर्वात महागड्या निवासी वसाहतीच्या एका खोलीत लिहिण्याची रणनीती बनविण्यात आली. ज्यात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आणि माजी खासदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष कुलदीप शर्मा हेदेखील उपस्थित होते. नंतर त्यावर अन्य नेत्यांच्या सह्या घेण्यात आल्या.

हे पत्र लिहिण्यासाठी कॉंग्रेसच्या आणखी एक दिग्गज नेत्याचाही आशीर्वाद असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या सर्व नेत्यांचा असा विश्वास आहे की सोनिया गांधींनी आपली क्षमता आणि योग्यतेने पार्टीला जिथपर्यंत शक्य होते तिथपर्यंत नेले आहे. राहुल गांधींबद्दल लोकांच्या मनात एक धारणा निर्माण झाली आहे. ज्यामुळे २०२४ मध्ये कॉंग्रेस कॉंग्रेसचा विजय होईल की नाही याबाबत साशंकता आहे. प्रियांका गांधीही जशी त्यांच्याकडून अपेक्षा होती तसा करिष्मा दाखवू शकलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत कॉंग्रेसला मोदीं आणि भाजपाविरोधात कॉंग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी गैर –गांधी अध्यक्षाची आवश्यकता आहे आणि नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पसंतीचा नको तर ज्येष्ठ नेत्यांच्या संमतीने  झाला पाहिजे.

कॉंग्रेसच्या एका दिग्गज नेत्याने सांगितल्यानुसार हा ‘लेटर बॉम्ब’ त्या नेत्यांनी आपल्या बचावासाठी सोडला आहे की ज्यांनी  गेल्या दोन दशकांपासून पक्ष आणि सरकारमध्ये सर्व महत्वाची पदे भूषवली आहेत आणि ज्यांच्या त्यांच्या कारस्थानांनी पक्षाला या दुर्दशेकडे नेले आहे. कॉंग्रेसचे या दिग्गज नेत्याने सांगितले की ज्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत त्या सर्व नेत्यांना गेल्या वीस वर्षात पक्षाच्या प्रत्येक स्तरावर पदाची संधी दिली गेली. पण पक्षाला पुढे नेण्यात त्यांचे योगदान किती आहे हे सर्वांच्या समोर आहे.  या नेत्याच्या म्हणण्यानुसार या 23 नेत्यांपैकी एकही नेता असा नाही ज्याला वंचित गटाचा म्हणता येईल.     तर दुसरीकडे योग्यता, निष्ठा आणि क्षमता असलेले अनेक पक्ष नेते वर्षानुवर्षे बाजूला गेले आहेत. परंतु त्यापैकी अद्याप कोणीही असे कोणतेही पाऊल उचलले नाही जे नेतृत्त्वाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. यातून एक गोष्ट स्पष्टपणे दर्शवते की पत्रे लिहिणे आणि लिहिणाऱ्यांचा खरा हेतू हा पक्ष हित आहे की स्वत:चा स्वार्थ आहे.

 राहुल गांधींच्या निकटवर्तीय असलेल्या युवा नेत्याच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी सध्या पक्षाध्यक्षपद स्वीकारणार नाहीत हे निश्चित आहे. परंतु नवीन अध्यक्ष तुलनेने तरुण आणि त्यांच्या पसंतीचा असला पाहिजे जो राहुल गांधी संघटनेमध्ये जो बदल करू इच्छितात ते सर्व बदल घडवून आणू शकेल. अशी   त्यांची इच्छा आहे. म्हणूनच या पत्राद्वारे जुन्या नेत्यांनी सोनिया गांधींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला की राहुल गांधी यांच्या निवडीच्या एखाद्या व्यक्तीच्या बाजूने मतदान करू नये आणि नवीन अध्यक्ष निवडण्याचे काम वरिष्ठ नेत्यांकडे सोपवावे.  राहुलच्या निकटवर्तीय असलेल्या या तरुण नेत्याच्या म्हण्यानुसार  असे झाल्यास, बड्या नेत्यांचा एक गट त्यांच्या पसंतीनुसार अध्यक्ष निवडतील आणि पक्ष आपल्या मतानुसार चालवतील .

त्याचवेळी हे पत्र लिलिहिणाऱ्या नेत्यांनी कुठलेही जाहीर विधान केलेलं नाही.  परंतु खासगी संभाषणात ते म्हणतात की त्यांना सोनिया राहुल आणि प्रियंका अध्यक्ष होण्यास हरकत नाही. पण जर बिगर गांधी   अध्यक्ष  म्हणून निवडायचा असेल तर  केसी वेणुगोपाल यांच्यासारख्या नेत्याला पक्ष नेतृत्व म्हणून राहुल   लादणार असतील तर ते स्वीकारले जाणार नाही. दरम्यान, राहुल गांधींची निवड केसी वेणुगोपाल असल्याचे मानले जात आहे.  हे पत्र लिहिणाऱ्या गटातील एका प्रभावशाली नेत्याच्या मते, जर बिगर गांधींच्या नावावर सहमती झाली नाही तर अध्यक्षपदाची निवड  करण्यासाठी निवडणुकीची तीव्र मागणीही  केली जाऊ शकते तथापि, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्यासारखे ज्येष्ठ नेते अध्यक्षपदासाठी निवडणुकीची  वेळ येऊ नये आणि सर्वांच्या संमतीने नवीन अध्यक्ष बनविण्याचा प्रयत्न करतील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *