gtag('js', new Date());
पुणे- कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कारवाई  करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देशही...
पुणे---भाजपा नेते एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीकडून मात्र, याबाबत कुठलेही सुतोवाच केलेले नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता, ‘मला एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल काहीही माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन...
पुणे—भाजप- शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिल्यानंतर त्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. ‘कॅग’ च्या अहवालामध्ये ही योजना अपयशी ठरली आहे. या योजनेवर 9634 कोटी रुपये खर्चूनही पाण्याची गरज भागवण्यात व भूजल पातळी वाढविण्यात अपयश आले आहे असे म्हटले आहे. याबाबत...
पुणे :मराठा व कुणबी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीससाठी स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी') या संस्थेला पुन्हा “स्वायत्ता” देण्यात आली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.मराठा आणि कुणबी समाजातील मुलं-मुलींसाठी बार्टी, यशदा सारख्या संस्थांच्या धर्तीवर तत्कालीन सरकारने...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—वाहिन्यांचा “टीआरपी’ घोटाळा समोर आल्यानंतर वाहिन्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका घेतली जात असतानाच टीव्ही वाहिन्यांच्या कामकाजाचे मोजमाप करणाऱ्या   'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल'नं (BARC) एक मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय बार्कने घेतला आहे. बार्कने निर्णय जाहीर करताना टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल याचा आढावा...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही लसीच्या अंतीम टप्प्यातील चाचण्याही सुरु आहेत. असा सर्व बातम्या सुरु असताना आता लस बाजारात आली की प्रत्येकजण ही लस आपल्याला मिळावी यासठी प्रयत्न करणार. परंतु, थांबा जरी लस बाजारात आली तरी ही लस निरोगी आणि तरुण असणाऱ्यांना २०२२ पर्यंत लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे....