पुणे-—पिंपरी-चिंचवड मधील महात्मा फुले नगर येथील एका कामगाराचा हृदयरोगाने मृत्यू झाला परंतु कोरोंनाच्या भीतीने हा मृतदेह तब्बल सहा तास तसाच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर या भागातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येत त्यांच्या सहकाऱ्यांसाह तो मृतदेह रुग्णालयात नेला त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या असंवेदनशीलते मुळे माणुसकी संपली आहे की काय असा प्रश्न उपस्थित...
पुणे :विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराई गुन्हेगार तब्बल 13 वर्षे पोलिस असल्याचे बनावट ओळखपत्र बनवून राजरोसपणे वावरत आणि त्याचा उपयोग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इम्तियाज इद्रीस मेमन (रा.तिरुपती सोसायटी, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर दंगल, जाळपोळ, खंडणी मागणे असे गुन्हे आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली...
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेले जंबो हॉस्पिटल सुरुवातीपासून कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहे.हॉस्पिटल सुरू करण्यात आले तेव्हा येथील ढिसाळ व्यवस्थेमुळे मोठा गोंधळ आणि वाद निर्माण झाला होता. आता येथे सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी आपले थकलेले वेतन मिळावे यासाठी शनिवारी सकाळी आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ही आंदोलन मागे घेण्यात आले.
पुणे-चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त आज सकाळी ९ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. विश्वस्त नरेंद्र अनगळ यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी करण्यात आले. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य केले. अध्यक्ष किरण अनगळ आणि देवेंद्र अनगळ यांची प्रमुख उपस्थिती होती.शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन...
मनोरंजन
कोरोनायोध्द्या डॉक्टरांमधल्या ‘दैवी’रूपाला नवरात्री फोटोशूटव्दारे तेजस्विनी पंडितने दिला ट्रिब्यूट
News24Pune -
पुणे-अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो. दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी सद्यस्थितीवर केलेले भाष्य असते. यंदा तेजस्विनी आपल्या फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना सलाम करत आहे.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी...
पुणे - देशात शब्द आणि संकल्पना मांडल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे लेखणी सत्ताधाऱ्यांच्या तलवारी बरोबर कशी लढू शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केली आहे.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या फेस्टिवल निमित्त आयोजित कार्यक्रमात शशी थरूर बोलत होते. शशी थरूर म्हणाले, मी शाळेत असताना लेखणीची धार तलवारीपेक्षा अधिक असते,...













