gtag('js', new Date());
पुणे -– प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी बालाजी तांबे यांनी मोठे कार्य केले आहे. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि...
पुणे- कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.वाई तालुक्यातील बलकवडे धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील डोंगराळ भागात असलेले गोळेगाव हे छोटेसे गाव. महाबळेश्वरच्या डोंगरावर व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे गावातील कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले.येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरातील साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचे पुराने वाहून गेल्यामुळे...
जगात खरा आनंदी व समाधानी कोण तर ज्याची श्रीमंती मनात असते. गाडी, बंगला दागिने, उच्चपदस्त नोकरी, भरभक्कम व्यवसाय, दांडगा बँक बॅलन्स हे सर्व पदरी असणारी व्यक्ती समाधानी, आनंदी व उत्साही असेलच असे अजिबात नाही. पण असे का? अनेकदा पैशाने श्रीमंत असणाऱ्या लोकांपेक्षा मनाने श्रीमंत असणारे लोकं आयुष्यात सरस ठरतात व आहे तसे आयुष्य समृद्धरित्या जगतात.
पुणे-केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेलेल्या दहावीत शिकणाऱ्य मुलीचा पाय घसरल्याने ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली परंतु नशीब बलवत्तर म्हणून ती बाल बाल बचावली. पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंट ही थरारक घटना घडली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ऋतुजा जगदाळे असं मुलीचं नाव असून ती इयत्ता दहावीत शिकते. याच अपार्टमेंटमध्ये...
पुणे-पिंपरीमध्ये आज (सोमवारी)  सकाळी शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पिंपरी भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या क्रोमा शोरूम जवळ ही वस्तू आढळली आहे.पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ कोहिनुर टॉवर ही सोसायटी आहे. सोसायटी जवळ मोकळी जागा असून तिथे अतिक्रमण...
पुणे--मी सुद्धा आता तेच तेच बोलून थकलो असल्याचे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन होत असलेल्या विलंबाबद्दलची नाराजी मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत व्यक्त केली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझार मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. तर नांदेड येथे २० ऑगस्ट रोजी मूक आंदोलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.