gtag('js', new Date());
मुंबई--रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कच्चा माल म्हणून वर्णन करताना म्हटले आहे की, नरेंद्र मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी विणलेल्या डिजिटल इंडियाचे अर्थपूर्ण निकाल आता समोर येत आहेत.अंबानी यांनी रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजेंस फॉर सोशल एंपावरमेंट Responsible Artificial Intelligence for Social Empowerment (रेज) २०२० च्या आभासी...
पुणेः- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षणातील सर्व घटकांबरोबर संवाद साधला जाईल. विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत हे धोरण पोहोचविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केला जाईल. तसेच संस्थांचे प्राचार्य आणि संचालक यांच्याकडून सूचना मागवल्या जातील, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्यात केली जाईल असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे राजेश पांडे यांनी सांगितले. 
पुणे- नवीन शैक्षणिक धोरणात ज्येष्ठांविषयी प्रेम, आत्मियता आणि आदर वृद्धिंगत होईल यादृष्टीने अभ्यासक्रमाचा अंतर्भाव व्हावा, जेणेकरून लहान मुलांना कोवळ्या वयातच ज्येष्ठांविषयीच्या या संवेदना बिंबवल्या जातील. योग्य वयात या संवेदना बिंबवण्यात आपण यशस्वी झालो, तर ज्येष्ठांविषयी आज उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू, अशी अपेक्षा पुण्यातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस.के. जैन यांनी व्यक्त केली.
पुणे - येत्या ४ ते ५ वर्षांत देशातील ‘सीएनजी स्टेशन्स’ची संख्या सध्याच्या ३ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. पंतप्रधानांनी कल्पना केल्याप्रमाणे वायूबाबतच्या प्रगत पायाभूत सुविधा निर्माण करण्याची सीजीडी उद्योगावर मोठी जबाबदारी आहे. सीजीडी उद्योगाला आणखी चालना देण्यासाठी भारत सरकार विविध पावले उचलत आहे आणि सर्वसामान्यांना परवडणार्‍या किंमतीत वायू उपलब्ध करुन देत असल्याचे केंद्रीय...
पुणे--शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. शेतक-यांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे. शेतीपूरक उद्योगांच्या वाढीसाठीही प्रयत्नांची गरज आहे. रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर देण्यासोबतच शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,  अशा सूचना  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज केले. जिल्ह्यातील खरीप, रब्बी परिस्थिती...
पुणे--कोरोनाच्या काळात अनेक आरोपी पॅरोल तसेच फर्लोवर सुटून आले आहेत. त्याचप्रमाणे वाढती बेरोजगारी यामुळे पुणे शहरात गुन्हे वाढत असण्याची शक्यता पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.  अमिताभ गुप्ता यांनी नुकताच पुण्याचे पोलीस आयुक्तपदी रुजू झाले आहेत. आम्हाला सर्व प्रकारच्या गॅंग संपुष्टात आणायच्या  आहेत. आम्ही ते करून दाखवणार आणि केल्यानंतर सांगणार असा दावा गुप्ता यांनी...