gtag('js', new Date());
पुणे- एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून त्या दोघींचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड भागात घडला आहे. दोन नराधमांनी बलात्कार आणि विनयभंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांनी त्यांच्या इतर तीन मित्रांच्या मदतीने या दोन मुलींचे अपहरण केले. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.गेल्या मंगळवारी...
पुणेः- साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिनांक 25 आणि 26 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यंदाचा वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी  आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ.अरूणा ढेरे यांना जाहीर झाला आहे.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी ही माहिती दिली.
पुणे--49 वर्षांपूर्वीच्या युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून येथील राष्ट्रीय युद्धस्मारक येथे  विजय दिवसानिमित्त विशेष समारंभ 16  डिसेंबर 2020 रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला.49 वर्षांपूर्वीच्या युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या युद्धातील भव्य विजयाचा परिणाम म्हणून पाकीस्तानचे विभाजन होऊन, बांगलादेशाची निर्मिती...
पुणे- सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैन्याने केवळ 13 दिवसांत  विजय मिळवला होता आणि पाकिस्तानला पूर्ण शरणागती पत्करावी लागली होती. या युद्धाचा परिणाम म्हणूनच पाकीस्तानचे विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती या आठवणींना उजाळा देत लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडीग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी युद्धाच्या विजय दिनानिमित्त विजयी वीरांचे स्मरण...
पुणे-कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सक्षम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. आपल्याकडे असलेल्या कुशल मनुष्यबळाच्या जोरावर विश्‍वास, कामाचा दर्जा आणि वेळ या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास. लवकरच आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात भारत हा चीनची जागा घेऊ शकेल, असा विश्‍वास प्रांज इंडस्ट्रिजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्‍त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या...
पुणे— पुणे-बंगळुरु महामार्गावर नवले ब्रीजवर भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र, काही वाहनांचा चुराडा झाला तर सातजण लखमी झाले. अलीकडच्या काळात नवले ब्रिजवर अशा प्रकारचा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. नवले ब्रिजजवळ वाहतुकीच्या रहदारीमुळे अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. काहीवेळा काही...