gtag('js', new Date());
पुणे--मागील आठवडाभरापासून पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. विसर्ग करण्यात आलेले पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रवाहात वाहत आहे त्यामुळे डेक्कन नदीपात्रातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भिडे...
पुणे-- जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढच्या ४८ तासांत जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुफान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरातही एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या दरम्यान, बाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.पुण्यात गेल्या आठवड्या पासून जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस...
पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी
पुणे--पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने थैमान घातले असून, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज (१४ जुलै) पुणे व पिंपरीतील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे व पिंपरी महापालिकेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ५ तालुके वगळता इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी देण्याचे आदेश...
आपल्या हिंदू संस्कृतीत निरपेक्ष कर्तव्याची भावना श्रेष्ठ मानली जाते. प्राचीन शिक्षणपद्धतीत आचार्य शुल्क किंवा मोबदला घेत नसत. किंबहुना गुरूचे शिष्याशी असलेले नाते आजच्या शिक्षक-विद्यार्थ्यासारखे नव्हते. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य दक्षिणा देत असे. अशी दक्षिणा हे गुरु व आश्रम यांच्या विषयीच्या कृतज्ञतेचे छोटेसे प्रतीक होते. कारण आचार्यांचे ऋण ही कधीही न फिटणारी गोष्ट असते.
पुणे--ओला कचऱ्याने आपली सोसायटी, परिसर इतकेच काय पण आपले संपूर्ण शहर विद्रुप होते. मात्र, याच ओल्या कचऱ्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला, त्यातून इंधन मिळाले तर, कचऱ्याची समस्या सुटेलच पण या समस्येकडे संधी म्हणून पहाता येईल, असा विश्वास पुण्यातील प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे यांनी ‘वायू’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून दाखवून दिले आहे.त्यांचा या प्रकल्पाची दखल...
पुणे- पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील  आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर गट नंबर २३२ मध्ये एका खाजगी व्यक्तीने खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले असताना त्यामध्ये खेळताना ३ भावडांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार येथील किशोर दास यांचे कुटूंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. त्यांचे हे मृत्यू पावलेले तीन अपत्य होते.