gtag('js', new Date());
शिवसेना होडी आंदोलन पुणे महापालिका
पुणे(प्रतिनिधी)-पुणे शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'होडी' धरून अनोखे आंदोलन करण्यात आले., शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून पालिकेचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.आज सकाळपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते महापालिकेच्या...
श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सव पुणे (Shriram Lagoo National Natya Mahotsav Pune)
कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितीही शिरकाव झाला, तरी रंगभूमीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त आविष्कार असतो. एआय हा त्याला पर्याय ठरू शकणार नाही, असा दृढ विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. रंगभूमीवरील उर्जेची सळसळ एआय आणू शकत नाही, असे रावल म्हणाले, तर अनेक प्रलोभने असूनही रंगभूमीवरील प्रयोग हाऊसफुल...
एमआरपी व्यवस्थेतील अपारदर्शकतेविरोधात पुण्यात आंदोलन
पुणे(प्रतिनिधी)--एमआरपी व्यवस्थेतील अपारदर्शकता व ग्राहकांच्या आर्थिक शोषणाविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी सविनय सत्याग्रह आंदोलन व निदर्शने करण्यात आली.आंदोलनाचे नेतृत्व मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब सीताराम औटी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक, केंद्रीय कार्यकारी सदस्य विजय सागर, ज्ञानेश्वर उंडे यांनी केले. विधी आयाम प्रमुख श्रीकांत जोशी, जिल्हा सचिव अशोक भोर, जगन्नाथ खोकराळे, देवीदास काळे...
थिएटर कमांड्स भारतासाठी काळाची गरज
पुणे(प्रतिनिधी)--लष्करातील 'थिएटर रायझेशन' किंवा 'थिएटर कमांड्स' ही काळाची गरज आहे. हे मान्य करण्यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, हे मॉडेल राबवताना केवळ जगाचे अनुकरण न करता भारताच्या भौगोलिक आणि सुरक्षा आव्हानांचा विचार करून एक 'टेलर मेड' आणि कस्टमाईज्ड मॉडेल तयार करणे आवश्यक आहे, असे मत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी) यांनी सोमवारी व्यक्त...
महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर; ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींची पुन्हा एकदा बाजी
पुणे(प्रतिनिधी)--महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने  फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल  शनिवारी (२ मे २०२६) घोषित करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या (९१.८८%) तुलनेत निकालात २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण...
राज ठाकरे पुणे वरुणराज भिडे पुरस्कार भाषण
पुणे: "आजच्या काळात राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. 'तुमच्या लिहिण्याने आमची सत्ता जात नाही आणि येतही नाही' असा जो अहंकारी समज राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे, तो मोडीत काढण्याची ताकद केवळ पत्रकारांच्या एकजुटीत आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर आसूड ओढले. पुण्यातील वरुणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे...