मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची चिंता आणि सुपुत्राला पब आणि बारची चिंता- आशिष शेलार

राजकारण
Spread the love

पुणे– मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची चिंता आणि त्यांच्या सुपुत्राला पब आणि बारची चिंता असल्याचा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी हे सरकार सुप्रीम कोर्टात बोट दाखवत आहे. तर, शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आला की दलालांकडे बोट दाखवत आहे. मुख्यमंत्र्यांना कसलीच चिंता नाही फक्त त्यांना बॉलिवूडची चिंता आहे आणि त्यांच्या सुपुत्राला पब आणि बारची चिंता आहे अशी टीका यावेळी शेलार यांनी केली.

राज्य सरकारने कोणालाही विश्वासात न घेता परस्पर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सांगितलेल्या वेळेत शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे अनेक महापालिकांनी सांगितले. यानंतर सरकारने पुन्हा स्थानिक प्रशासन यासंबधीचे निर्णय घेईल, असे सांगितले. शिक्षणाधिकारी, शिक्षक संघटना, पालक संघटना, जिल्हाधिकारी कोणाशीच चर्चा नाही. हे सरकार आहे की छळवणुकीचे केंद्र?’ असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

 वीजबिलाच्या विषयात सरकार जनतेचा विश्वासघात का करत आहे?’वीजबिलाचा विषय एकदा राज्यातील जनतेसमोर स्पष्ट झाला पाहिजे. दिल्लीतील केजरावाल सरकारने जनतेला 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली. यानंतर राज्यातील मंत्री नितीन राऊत यांनीही जनतेला 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली. काणीही मागणी न करता केलेली ही घोषणा सरकारने पूर्ण करावी. ही घोषणा करताना संबंधित तिन्ही कंपन्यांचा आर्थिक ताळेबंद लक्षात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करत ही घोषणा केली होती का, असा आमचा प्रश्न आहे. कोरोना काळात वाढीव बिले कशी आली? सरकार जनतेचा विश्वासघात का करत आहे, असाही आमचा सवाल असल्याचं शेलार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *