आरोपींची मुक्तता झाली मग ती मशीद आपोआप पडली का? कोण म्हणाले असे?

राजकारण
Spread the love

पुणे —बाबरी मशिद प्रकरणात 200 पेक्षा अधिक लोकांच्या साक्षी घेतल्या गेल्या. हजारो पानांचे आरोपपत्र आहे. तरीही आरोपींची मुक्तता झाली. यावरून ती मशीद आपोआप पडली का? असा प्रश्न उपस्थित करत बाबरी मशिद विद्ध्वंस प्रकरणी लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेला निकाल हा अविश्वसनीय असून पचण्यास कठीण आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले आहे.

अनेकजण घुमटावर चढले होते. एवढी मोठी मशिद पाच तासात पडली. तर यामागे कोणीतरी नक्कीच असेल ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.बाबरीसारख्या घटनांमधून आपली सुटका होणार नाही. आता मथुरा, वाराणसी याठिकाणी नवीन मंदिरे बांधली जावीत, अशी मागणी होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकरणांपासून दूर रहायचे असेल तर धर्म आणि राजकारण यांची फारकत होणे गरजेचे आहे. मात्र, राज्यकर्ते याविषयी काही बोलायला तयार नाहीत. येणाऱ्या काळात आपण काहीही केलं तरी सुटू शकतो, अशी मानसिकता यातून निर्माण होऊ शकते, अशी भीती गोडबोले यांनी व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *