आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?


नाशिक- पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हॅट्रिकनंतर  राज्यातील भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं.ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे?  तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्यावरून संतापलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  भुजबळांना,” तुम्ही जामिनावर आहात, निर्दोष सुटलेले नाही.  जास्त जोरात बोलू नका अन्यथा, फार महागात पडेल”, असा दम भरला होता.

त्यावर आता  भुजबळांनी पलटवार केला आहे. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?, असा चिमटा त्यांनी काढला. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही, असा टोलाही छगन भुजबळांनी लगावला आहे.

अधिक वाचा  पुण्यात बसून नगरची मापं काढण्याचा प्रकार बंद करावा- जयंत पाटील

 .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love