gtag('js', new Date());
पुणे--पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुध्द त्यांचे मेव्हणे बांधकाम व्यावसायिक युवराज काकडे यांनी गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर  काकडे व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून दोन मेव्हण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे....
मुंबई(ऑनलाईन टीम)—आज रक्षाबंधन भाऊ- बहिणीच्या पवित्र नात्याचा हा दिवस. भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतील  ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांचे औक्षण करुन राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीयउपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून...
ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठीपुणे--ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. ससून रुग्णालयात ४ ऑगस्ट पर्यंत १७५ ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील तर उर्वरित खाटा लवकरच तयार होतील असे सांगून ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठी वापरण्याचे...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.https://twitter.com/ANI/status/1289882730897895425?s=20शहा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,  'कोरोनाची सुरुवातीची लक्षणे पाहून, माझी चाचणी घेण्यात आली आणि रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. माझी...
मुंबई—महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद  अनेकवेळा चव्हाट्यावर आला आहे. परंतु, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असे, तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून कुठलाही वाद झाला की नंतर स्पष्ट केले जाते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्याचीच संधी साधून आम्हाला सरकार पाडायची गरज नाही, त्यांच्यातील वादानेच हे सरकार पडेल अशी वारंवार टीका करत असतात.
जबलपूर(ऑनलाईन टीम)—अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु आहे. या तयारीचे व्हिडीओ आणि छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा  वादग्रस्त बाबरी मशिद पाडण्यात आली त्यानंतर देशात दंगली उसळल्या होत्या. मात्र, श्रीरामावर निस्सीम भक्ती असलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेने तेव्हापासून संकल्प केला होता. श्रीराम मंदिराचा जोपर्यंत पाया घातला जात नाही तोपर्यंत...