gtag('js', new Date());
पुणे -सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम 2...
पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे त्यांच्या रोखठोक, स्पष्ट आणि वेळप्रसंगी तामसी स्वभावामुळे जसे प्रसिद्ध आहेत तसेच ते कधी मूडमध्ये असतील तर त्यांच्या विनोदी किस्से आणि उदाहरणामुळेही प्रसिद्ध आहेत. आज पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजितदादांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना विद्यार्थ्यांनी राजकारणात का येऊ नये आणि कुठले करिअर निवडावे...
पुणे-जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून राळेगण सिद्धी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यावर  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत अण्णांच्या उपोषणाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.  अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात. त्यांना चूका, अन्याय दिसला तर ते आंदोलन करतात. आजही आपण त्यांची भुमिका ऐकलेली आहे. अण्णा त्यांच्या...
पुणे- साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यामान कार्यकारी मंडळाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षे मुदतवाढ देण्यावरून परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा वादंग झाला. एखाद्या सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा असावी अशा वातावरणात अखेर विरोधकांचा विरोध डावलून विद्यमान कार्यकारी मंडळाला निवडणूक न घेता 5 वर्षे मुदत वाढ देण्याचा निर्णय आवाजी मतदानाने घेण्यात आला.
पुणे--महात्मा गांधी यांचा मोहनदास करमचंद गांधीपासून सुरू झालेला प्रवास हा महात्मा पर्यंत पोचला. या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट जावणते की महात्मा हा उशिरा जन्माला आलेला आहे. हा संपूर्ण प्रवास जाणिवांचा, विचारांचा, अनुभवांचा प्रवास आहे. आजच्या वातावरणात देशात परदेशात कुठेही गांधींच्या अहिंसेच्या विचारांची दखल ही शांतता देऊन जाते. त्यामुळे महात्मा गांधींचे विचार हा चमत्कार नव्हे तर तो...
पुणे- पती जाणे आणि विधवा होने हा काही स्रीचा दोष नाही.परंतू, विधवा महीलेला समाजाने दिलेली ही भयंकर शिक्षा आहे.ती शिक्षा भोगतांना विधवा स्रियांना जो काय मनस्ताप होतो त्रास होतो त्याची कल्पना करवत नाही. पती नसेल तर त्या महीलेने घरातील सर्व कामे करणे, जेवन बनवने, देवपुजा, नोकरी, मुलांचे पालन पोषण, सासू सासरे यांची जबाबदारी, ईतर जबाबदारी, हे...