gtag('js', new Date());
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी वारी सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे पार पडणार आहे. उद्या ( गुरुवार दि. 1 जुलै ) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तर  शुक्रवारी(दि. 2 जुलै) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.पंढरपूरच्या आषाढी वारीला जगद्गुरू...
पुणे- दि २६ जून २०२१ रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती, सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने 'विवेक विचार मंच'च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष माननीय विजयजी सांपला यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेच्या आयोजनात संपूर्ण महाराष्ट्रातून पन्नासहून अधिक संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी अनुसूचित जाती-जमाती व अन्य वंचित घटकांवर...
पुणे- आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेच्या पाच वर्षाच्या वाटचालीत मनाच्या टोपीमध्ये अजून एक तुरा रोवला गेला आहे..पुणे मेट्रो कंपनीने आज आम आदमी रिक्षाचालक संघटनेबरोबर ( first mile to last mile)करार केला आहे. ह्यामुळे हजारो रिक्षाचालकांच्या उत्पन्नात वाढ होण्यात मदत होणार आहेच परंतु, भविष्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.
पुणे-ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दयावर महाराष्ट्रात भाजपाने चक्काजाम आंदोलनाची हाक दिलेली असताना दुसरीकडे ओबीसी नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली आहे. पक्ष कोणता आहे, याविषयी काही फरक पडत नाही. जो-जो ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भांडतोय, त्यांचे आम्ही स्वागत करतो. देवेंद्र फडणवीस...
पुणे- चुकून तुम्ही राजकारणात आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही अशा शब्दांत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने  सांगितलेला एम्पिरिकल डाटा तयार करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारचीच  असून तो त्वरित गोळा करावा अशी मागणी करत महाविकास आघाडी सरकारमुळेच संपूर्ण ओबीसी समाजाला आज रस्त्यावर उतरायला...
पुणे--आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची  मदत घेवून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन घ्यावा. या विद्यापिठाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर येण्यासाठी प्रयत्न करावे. या सर्वांचा परिणाम म्हणून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रतिभावंत खेळाडू घडविणारे केंद्र म्हणून या विद्यापीठाकडे बघितले गेले पाहिजे. उद्योग जगतातील लोकांना सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सहभागी करुन घ्यावे,...