gtag('js', new Date());
पुणे— फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन तरूणांवर  प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात  ही घटना घडल आहे. दरम्यान,  या प्रकरणातील आठही आरोपी फरार झाले आहेत.शिवम संतोष शितकल (वय २३) आणि गणेश रमेश माखर (वय २३ )...
पुणे- काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यातील परिस्थिती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. कारण, पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटल्यामुळे सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्यादृष्टीने हे चांगले लक्षण मानले जात आहे.जम्बो सेंटरमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या...
पुणे(प्रतिनिधि)-एमपीएससीची परीक्षा होऊनही दोन वर्षे नियुक्ती न झाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला राज्य शासनच पूर्णतः जबाबदार आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी घेतला आहे ,असा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. एमपीएससीच्या प्रलंबीत परीक्षा, ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीवर रुजू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने तात्काळ पूर्ण करावी अन्यथा...
पुणे- आघाडी सरकारच्या ओबीसी सहित सर्वच घटकांच्या आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कात्रज चौक येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव व शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतोडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विनायक रुपनवर यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आले.   सविता जोशी, ऍड. राजश्री माने,...
पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व आणि मुख्य परीक्षा होऊन दोन वर्षे उलटल्यानंतरही नियुक्तीसाठी मुलाखत होत नाही म्हणून नैराश्याने ग्रासलेल्या पुण्यातील फुरसूंगी भागातील  स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्याअगोदर सुसाइड नोट लिहिलेली आहे. त्यातून एमपीएससी परीक्षा देणाऱ्या आणि परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झालेल्या तरुणांच्या प्रश्नांची दाहकता ही राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे....
पुणे--महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दीड वर्ष उलटूनही नियुक्ती न झाल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या पुण्यातील फुरसूनगी भागातील तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव असून त्याने लिहिलेल्या सुसाइड नोटमधून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.