gtag('js', new Date());
Image

चांगली कविता माणसाला खेचूनच घेते : कवी वैभव जोशी

Spread the love

पुणे- “अनेक प्रश्न या पिढीसमोर आहेत. सध्याच्या काळाचं प्रतिबिंब या कवितांमधून वाचायला मिळतं, त्यामुळे चांगली कविता माणसाला खेचूनच घेते.” असे उद्गार प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी काढले.

तनया गाडगीळ लिखित ‘विवश’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.  

“संपूर्ण पुस्तक वाचत असताना विचारांमधील प्रगल्भता अचंबित करणारी आहे.  कॅलिडोस्कोप सारखी या काव्यसंग्रहातील कविता परत परत वाचताना दरवेळी वेगळं काहीतरी दाखवते. विचारांमधला ठामपणा, प्रामाणिकपणा, अंधाराची स्वीकृती या कवितांमधून जाणवते. अलीकडच्या काळातलं वाचलेलं हे चांगलं पुस्तक आहे आणि म्हणूनच ही कविता नक्की टिकेल असं मला वाटतं.” असेही मत वैभव जोशी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कवयित्री तनया गाडगीळ याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “नकारात्मक भावनांनाही एक मानाचे स्थान असावे. घटना आणि भावनांची कोंडी होते त्यावेळी जाणवतं की आपण अनेक वेळा हतबल असतो. अश्रू आणि विचारांचा गुंता यातूनच जन्माला आली आहे ही कविता.”

अधिक वाचा  बाह्य आणि अंतरविश्वातील संघर्षाचा हुंकार म्हणजे कविता- डॉ. रावसाहेब कसबे

तारांगण प्रकाशनातर्फे विवश हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. तारांगण प्रकाशनाचे मंदार जोशी याप्रसंगी बोलताना म्हणाले, “उत्तम कवयित्रीचं पहिलं लक्षण म्हणजे भावनाशील असणं. चांगल्या कवितेची अनेक वैशिष्ट्ये या काव्यसंग्रहात अनुभवायला मिळतात.”

 विवश या कवितासंग्रहाच्या छोटेखानी प्रकाशन समारंभास रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर आणि संवाद पुणे चे सुनील महाजन उपस्थित होते. प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रोहन गाडगीळ यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

राज ठाकरे यांचा घणाघात : “जिथे जमीन भुसभुशीत तिथेच घुशी शिरतात” :

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— स्वतःच्या राज्यात सुधारणा न करणाऱ्या ‘भैय्यांना’ इथे मराठी शिकवून काय साध्य होणार?, असा सवाल…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

राज्य सरकारच्या नवीन सौर धोरणामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले; ८ लाख रुपयांचा दरमहा फटका आणि स्थलांतराची भीती

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)– राज्य सरकारने आणलेल्या नवीन सोलर धोरणातील ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

आम्ही पुणेकर आणि काफिला फाऊंडेशनतर्फे काश्मीरच्या दुर्गम भागात मानवतावादी मदत मोहीम; शैक्षणिक व वैद्यकीय साहित्याचे वाटप

Spread the love

Spread the love पुणे: राष्ट्रीयएकात्मता, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत ‘आम्ही पुणेकर’  आणि काफिला फाऊंडेशन (जम्मू-काश्मीर) यांच्या…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

चांगली कविता माणसाला खेचूनच घेते : कवी वैभव जोशी

by News24Pune time to read: <1 min
0