अपहरण झालेल्या वकिलाचा ‘दृश्यम’ चित्रपटाच्या स्टाईलने खून


पुणे– पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झालेल्या वकिलाचा खून करून त्याचा मृतदेह जाळून ताम्हिणी घाटात टाकून दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हा खून जमिनीच्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे हा खून करण्यात आला आहे. यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.  अ‍ॅड. उमेश मोरे  असे खून झलेल्या वकिलांचे नाव आहे.

शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात अ‍ॅड. उमेश मोरे हे वकिली करत होते. ते १ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. बरेच दिवस उलटून गेल्यावर देखील त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे त्यांच्या भावाने याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण मोरे यांचा जमिनीच्या वादातून खून झाला असल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासातुन समोर येत आहे.

अधिक वाचा  पोलिसांनी अटक केलेला  बांगलादेशी निघाला बॉम्बस्फोटातील आरोपी

या खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. कपिल विलास फलके(वय ३४, चिखली,पुणे),, दीपक शिवाजी वांडेकर(वय-२८, रा. आष्टी, जि.-बीड) व रोहित दत्तात्रय शेंडे(वय-३२, रा. मार्केट यार्ड,पुणे) अशी अटक  करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मोरे आणि आरोपींमध्ये २१०८ मध्ये लाच प्रकरणात तक्रार दिल्यावरून वाद झाले होते. अटक केलेल्यांमध्ये  रोहित शेंडे हे वकील असून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 कोटी 70 लाख लाचप्रकरणी अटक  केली होती.

एक ऑक्टोबर रोजी उमेश मोरे यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा खून झाला. त्यानंतर पुअरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला. त्यानंतर आरोपी पसार झाले. आरोपींनी  दृश्यम चित्रपटाप्रमाणे आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. वकील मोरे यांचा मोबाईल त्यांनी एक तरकरीच्या गाडीत टाकला. ती गाडी फिरत राहिली व मार्केटयार्डला गेली. तेथे एका व्यापाऱ्याला तो मोबाईल सापडला. आणि पोलिसांना या घटनेतील महत्वाचा धागा दोरा मिळाला. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि या अपहरण व खून प्रकरणाचा उलगडा झाला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love