gtag('js', new Date());
पुणे   केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतक -यांकडून होत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा कॉंग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी युवा कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि  शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
पुणे- दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत , असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. भाजपातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  
आधुनिक वाल्मिकी अर्थात ग. दि. माडगूळकर यांचा आज (ता. १४ डिसेंबर) हा पुण्यस्मरण दिन त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन...रामायणातील कथांचा आणि त्यातील आदर्शवत समाज जीवनाची संमोहित करणारी वाटचाल सर्व विश्वाला प्रेरित करत होती. सुमारे ६५ वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक एक एप्रिल १९५५ रामनवमीला पुणे आकाशवाणीवरून रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी एक अजोड रामकथा म्हणजे...
पुणे-महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या वतीने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मागील 5 - 6 महिन्या पासून अनेकदा मा. मुख्यमंत्री, उर्जामंत्री, यांच्याकडे पत्र पाठूवन आंदोलने, पाठपुरावा केला या असंख्य पत्रव्यवहारा नंतर देखील कामगारांच्या समस्यांकडे मा. मुख्यमंत्री व मा. उर्जामंत्री यांनी आजवर सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना सध्या वीज उद्योगातील कामगारांची झाली आहे त्यामुळे...
पुणे : श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूरने संशोधित केलेले 'माधव रसायन' हे औषध कोरोनावर परिणामकारक ठरले आहे. कोरोनातील 'इंटरल्यूकेन-६' (आयएल-६) या घातक रासायनिक द्रव्याला निष्क्रिय करण्यासाठी औषधाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. दिल्ली येथे केलेल्या शास्त्रीय चाचण्यांनंतर हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्रातील मुख्य...
श्रीगोंदा --निर्यातबंदी नंतर कांद्याचे भाव पडले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भाजपाच्या खासदारांना 'कांदा मारो' आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. श्रीगोंदा येथे शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व.शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त नगर व पुणे जिल्ह्याची संयुक्त बैठक झाली. याबैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे   शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल...