पुणे- काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेले पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. गेल्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राव हजार होते तर शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला प्रतिबंध कसा करता येईल याबाबत राव स्वत: प्रशासकीय बैठका घेत होते.
पुणे -कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली असून, यासंदर्भातील हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना 10 टक्के नफा घेऊन विकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन होत नसून, रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे ही पिळवणूक तातडीने थांबवावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्राद्वारे आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुणे-मुंबई
पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटला भीषण आग: २५ गाळे जळून खाक तर कोंबड्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू
News24Pune -
पुणे- पुणे शहरातील कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटला मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये मार्केटमधील चिकन, मटन आणि मासळीची एकूण २५ दुकाने जळून खाक झाली तर या गाळ्यांमध्ये असलेल्या कोंबड्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने या आगीत कुठलीही मनुष्यहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज...
पुणे- पश्चिम बंगाल, आसाम,तामिळनाडू या राज्यांसह पाच राज्याच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष्य लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काटे की टक्कर सुरु आहे. दरम्यान, या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकीत वर्तवले आहे. केवळ आसाम वगळता इतर राज्यांमध्ये भाजपचा पराभव होईल असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.
पुणे- सन २००४ मध्ये सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते. वाझे यांनी त्याबाबत ३० नोव्हेंबर २००७ पुनर्रयाचिका दाखल केली होती. परंतु, ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला तो स्वीकारण्यात आला. त्यावेळी गृहमंत्री राष्ट्रवादीचे होते. मग आता त्याच वाझे मध्ये असं काय सापडलं की त्यासाठी कमिटी नेमली गेली आणि...
राजकारण
५० कोटीची वसुली सहजरीत्या होऊ शकते, हाच वाझे यांना पुन्हा रुजू करून घेण्यामागे उद्धव ठाकरे यांचा उद्देश – किरीट सोमय्या
News24Pune -
पुणे-कोरोनाच्या काळात मातोश्री मधून एकदाही बाहेर न पडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावरील अधिकाऱ्यासाठी अजय मेहता यांच्या यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल स्विकारून एपीआय सचिन वाझे यांना ताबडतोब परत रुजू करून घेण्याच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सही केली. उद्धव ठाकरे यांना एक वसुली...














