The opposition parties could not provide an alternative to Prime Minister Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत : मोहोळांना मत म्हणजे मजबूत भारत बनवण्यासाठी मोदीजींना मत – देवेंद्र फडणवीस

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)— एकीकडे विकासपुरूष नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समवेत वेगवेगळे १८ मित्र पक्षांची महायूती तर  राहुल गांधी यांच्या समवेत असलेली २४ पक्षांची खिचडी आहे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. २४ नेते संगीत खुर्चीतून पाच वर्षे एक याप्रमाणे नेता निवडतील. विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे. मोदीजींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. दरम्यान, 140 कोटी लोकांचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत, असा टोलाही त्यांनी लंगावला. ‘सबका साथ सबका विकास’ मोदीजी करीत आहेत असेही ते म्हणाले.  

पुणे लोकसभा महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ बाणेर येथी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत फडणवीस बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहर अध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, हर्षवर्धन पाटील, जगदीश मुळीक, मकरंद देशपांडे, दत्ता गायकवाड, गणेश बिडकर, बाबुराव चांदेरे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, परशुराम वाडेकर, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अर्चना मुसळे, मयुरी कोकाटे, लहु बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

फडणवीस म्हणाले, मोदीजींनी काय जादू केली पहा 25 कोटी लोक गरीबी रेषेखाली आले. 20 कोटी लोकांना घरे, 50 कोटी लोकाना शौचालये, 60 कोटी लोकांना नळाद्वारे पाणी, 80 कोटी लोकांना रेशन दिले आणि  पुढील पाच वर्षे रेशन देणार आहेत.  55 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजना, 63 कोटी लोकांना मुद्रा कर्ज दिले.  त्यात 50 टक्क्यांहून जास्त मुली आणि महिला आहेत, 20 लाखापर्यंतचे कर्ज आता देणार आहेत.  80 लाख बचतगटांना निधी दिला, 10 कोटी लखपती दिदी होतील, बारा बलुतेदारांना विश्वकर्मा योजना आणली, आधुनिक प्रशिक्षण दिले, ज्येष्ठ नागरिकांना सर्व उपचार मोफत केले, वयोश्री योजना आणली, दिव्यांगासाठी कृत्रिम पाय आणि हाताच्या फॅक्टरी भारतात उघडल्या.

फडणवीस पुढे म्हणाले, मोदीजींनी पहिल्यांदा शहराची काळजी केली, शहरीकरण म्हणजे पहिल्यांदा शाप वाटायचा. गेल्या पन्नास वर्षांत लोक  शिक्षण, आरोग्य,रोजगारासाठी आले पण राहायला जागा, पिण्याला पाणी नव्हते, सांडपाणी व्यवस्था नव्हती. परंतु घनकचरा व्यवस्थापन एसटीपीसाठी पुण्याला निधी दिला. पिण्याच्या पाण्यासाठी मोदींनी निधी दिला. पुण्यात मेट्रो धावते आहे. त्याचे आणखी नेटवर्क तयार होते आहे. प्रदूषण टाळले जात आहे.  मेट्रोसह इलेक्टिक बस आल्या. सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आहेत. स्मार्ट सिटीचे व्हिजन आहे. मोदीजींच्या निधीतून कामे केली. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना पक्की घरे दिली. त्यामुळे पुणे सुनियोजित शहर तयार होईल.

2014 पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले. अजित पवार यांच्या एअरपोर्ट, रिंगरोड यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. मॅन्युफॅकचरिंग आयटी हब आहे. देशातील सर्वोत्तम शहर बनण्याची ताकद पुण्यात आहे. आपण केवळ एक खासदार निवडुन देत नाही तर पुण्याकरता काम करणाऱ्या मोदींसाठी खासदार निवडून देत आहोत. त्यांच्या माध्यमातून काम करायचे आहे. बापट साहेबांनी चांगले काम केले. त्यांचे काम पुढे न्यायचे आहे.

कोविडमध्ये अवस्था बिकट होती. 140 कोटी भारतात 40 ते 50 लोक मरतील असे जगातले लोक म्हणायचे. काही देश भारत आपल्याकडे व्हॅक्सिनसाठी येईल म्हणून वाट पाहात होते. मोदींनी शास्त्रज्ञ एकत्र केले,रॉ मटेरियल दिले, परदेशातून आवश्यक घटक आणले, 140 कोटी लोकांना व्हॅक्सिन दिले. मॉरिशस सारख्या 100 देशांना लस दिली. ते म्हणतात नरेंद्र मोदी हा आमचा नेता आहे. आपले पंतप्रधान जागतिक नेते झाले आहेत. एक मजबूत भारत मोदीजींच्या मुळे झाला आहे.

बॉम्बस्फोट आधी व्हायचे केवळ अमेरिकेत जावून पुरावे द्यायचे. मोदी पंतप्रधान झाल्यावर बॉम्बस्फोट झाले नाहीत.  आपण सर्जिकल स्टाईक केला. जगात पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो. त्यातून संधी, रोजगार, गरीब कल्याण, मजबूत देश तयार होत आहे. लोकशाहीत मतदानाचा पवित्र अधिकार आहे. जो मतदान करतो त्याला नैतिक अधिकार आहे. मतदान ही देशसेवा आहे. तुमच्या मतदानातून कर्तबगार सरकार तयार होते. कमळाचे बटन दाबा, मुरलीधर मोहोळ यांना मत मिळेल. तुमचे आशीर्वाद मोदींना मिळतील मोदीजी मजबूत भारत बनवतील.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गिरीश बापट यांना 3 लाख 23 हजार मतांचे मताधिक्य होते. ते वाढविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार यांनी अधिकाधिक मतदान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी देशाच्या निवडणुकीत मतदान घडवावे लागेल. मोदीजींनी समाजाच्या विविध घटकांसाठी काम केले. 2014 ला 18 कोटी मतदान झाले तर 2019 ला 23 कोटी मतदान झाले. या वेळेला 30 कोटी मतदान होईल असे राजकीय जाणकार सांगतात. कारण आपल्याला मोदीजींनी जे आश्वासन दिले ते पूर्ण केले. प्रत्येक योजनेत 141 कोटी लोकांना सहभागी करून घेतले. दारिद्य्र रेषेखालील 25 टक्के लोकांना बाहेर आणले. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. विक्रमी मताधिक्याने मुरलीधर मोहोळ यांना विजयी करावे.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ॲमेनिटी स्पेसवर विविध सुविधा झाल्या. अतिशय वेगाने मेट्रोची वाढ होते आहे. चांदणी चौकाचे काम पूर्ण होऊ शकले. पायाभूत सुविधांसाठी निधी दिलेला आहे. पाणीपुरवठ्याची अपुरी सोय आहे. रोज टँकरने पाणी मागवावे लागते. सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प गंभीर आहे. प्रशासनावर अंकुश ठेवण्याची गरज आहे. आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून या भागाचा विकास झाला. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना मतदानाच्या रुपाने आशिर्वाद मिळेल असा विश्वास वाटतो.

युवकाच्या संकल्पपत्राचे या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून हे संकल्पपत्र तयार करण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *