भ्रमिष्टावस्था दूर करण्याची जबाबदारी लेखकांनी पार पाडावी- राजन गवस

उदगीर : (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी) : महाराष्ट्र हे अत्यन्त पुरोगामी राज्य असताना मराठी साहित्यात आज वैचारिक दारिद्रय निर्माण झाले आहे. आजच्या या भ्रमिष्टावस्थेत उद्याच्या महाराष्ट्राचा चेहरा कायम ठेवायचा असेल, तर लेखकांना लिहिण्याची, बोलण्याची आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, अशी अपेक्षा प्रसिद्ध लेखक राजन गवस यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. 95 व्या अखिल भारतीय […]

Read More

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी : शरद पवार

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) – अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रथा असल्याने महिलांसाठी ते अशक्यप्राय होऊ नये असे मला वाटते. महामंडळाने निवडणूक पद्धतीत एखादे महिला समावेशक धोरण आणले तर त्याचे मी प्रथम स्वागत करील. मला वाटते महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद […]

Read More

साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कन्ट्रोल असू नये- शरद पवार

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) – लोकाश्रयापेक्षा राजाश्रयाच्या हत्तीवरील अंबारीत जर आम्ही साहित्य शारदेला बसवू लागलो तर ‘अमृतातेहि पैजा जिंके’ असे बोल तिच्या वीणेतून कसे उमटतील? असा लेखक आणि विचारवंत विद्याधर गोखले यांच्या वाक्याचा संदर्भ देत साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कन्ट्रोल असू नये, (writers should control politicians but rulers […]

Read More

साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वाणवा जाणवते: अशा वृत्तींना ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर !’ असा रोखठोक सवाल विचारावयास हवा -शरद पवार

उदगीर (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी)- मला एका वेगळ्या विषयाकडे लक्ष वेधावयाचे आहे. मला साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वाणवा जाणवते. संशोधनात्मक लिहिले जात असेल परंतू ते वाचकांपर्यंत पोहोचत नसावे. विशेषत: ऐतिहासिक लिखाणात सखोल संशोधन व अभ्यास आवश्यक असतो. इतिहासकाराने सबळ पुराव्याधारे न लिहिता ऐकीव व तार्कीक माहितीधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो अनेक दीर्घकालीन वाद-विवादांना […]

Read More

आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत:देशात विशिष्ट विचारधारेचा प्रपोगंडा फैलावताना दिसतो आहे – शरद पवार

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) -समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून अनेक वाद जन्मला आले, जसे की, गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद , राष्ट्रवाद वगैरे ! परंतू आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. हि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, (Nowadays, certain elements are emphasizing on the production of literature […]

Read More

भ्रमीत समाजात ‘चतुरमौन’ : भारत सासणे :95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,उदगीर, श्री. भारत सासणे यांचे अध्यक्षीय मनोगत

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) : अलीकडच्या काळात मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असताना आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे. मराठी बालसाहित्यातून अद्भुतरस हद्दपार केला आहे. आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावे लागत आहे. सत्याचा […]

Read More