पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग -10)

सन १८३५ मध्ये हैबतबाबांनी श्री ज्ञानेश्वरांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला, याकामी त्यांना वासकर महाराज, आजरेकर महाराज व सरदार शितोळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. बैलगाडीवर आडव्या फळ्या टाकून त्यावर पालखी ठेवून पंढरपुरास पालखी आणण्याची प्रथा सुरू झाली, पालखी सोहळ्याचा आर्थिक भार श्री शितोळे सरदार यांनी उचलला. हैबतबाबा यांनी पालखी सोहळ्यात सैनिकी शिस्त आणली, त्यामुळे पालखीचे […]

Read More

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 9)

श्री नारायण बाबांनी प्रयत्नपूर्वक सन १६८० मध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला, परंतु त्याच वेळी शिवाजी महाराजांचे नुकतेच निधन झाले होते व महाराष्ट्रात मुस्लीम आक्रमणाची प्रचंड लाट उसळली होती, त्यामुळे पंढरपूरचा मार्ग हा सुरक्षित वाटत नव्हता. त्यामुळे पालखी समवेत जाणारे टाळकरी व वारकरी यांना सतत भय वाटत होते, अशावेळी श्री नारायण […]

Read More

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 8)

संत तुकाराम महाराज सन १६४९ मध्ये सदेह वैकुंठगमनाला गेले,श्री तुकोबांचा विरह त्यांचे निकटवर्ती १४ टाळकरी व दिंडीतील वारकरी यांना जाणवत होता. तुकयांचे बंधू कान्होबा हे पुढे प्रथा चालवीत होते, पण तुकाराम महाराजांच्या विरहामुळे त्यांचे कशातच चित्त लागत नव्हते. त्यांनी त्यांच्या हयातीतच या दिंडीची सर्व जबाबदारी श्री तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण बाबा यांचेवर हळूहळू […]

Read More

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-७)

आळंदी, देहू व इतर स्थानावरून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांबाबत आज मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते, आषाढीच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी गावोगावच्या पालख्या पंढरीच्या वाटेने चालताना दिसतात  व संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती चैतन्य संचारते. परंतु आळंदी व देहू येथून निघणारा दिंडी सोहळा हा कधीपासून सुरू झाला याबाबत मात्र अभ्यासकांमध्ये मतमतांतरे दिसून येतात. संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या आरतीमध्ये आषाढी कार्तिकी […]

Read More

पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-6)

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूर या नगरीचेही महात्म्य निराळेच आहे. पंढरपूर हे कधी वसले गेले किंवा ते कधीपासून अस्तित्वात आहे? याबाबतची उत्सुकता अनेकदा व्यक्त होते. ॥ जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥ असे जरी म्हटले जात असले तरी पंढरपूर हे स्थान इसवीसनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापासून […]

Read More

पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-5)

वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन […]

Read More