देशाला कृषिमंत्री नसेल, तर देश कसा चालणार? – शरद पवार

If the country does not have an agriculture minister, how will the country run?
If the country does not have an agriculture minister, how will the country run?

Akrosh Morcha -देशातील कांदा (Onion), सोयाबीन(soybeans), हरभरा (gram)उत्पादक आज संकटात असून, बळीराजा (Baliraja) अस्वस्थ आहे. मात्र, आपल्या कृषिप्रधान देशाला (Agricultural country) कृषिमंत्री (Agriculture Minister) नाही, अशी सध्याची अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे हे सरकार ढुंकूनही बघायला तयार नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपा (bjp) सरकारवर शनिवारी निशाणा साधला. (If the country does not have an agriculture minister, how will the country run?)

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, आज शेतकरी (Farmer)अस्वस्थ आहे. मागच्या १० दिवसांत यवमतमाळ(Yeotmal) व परिसरात २५ शेतकयांनी आत्महत्या (Sucide) केल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. मात्र, आज शेतकऱ्यांकडे कुणी ढुंकून पहायला तयार नाही. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या (UPA Govt.) काळात शेतकऱ्यांकरिता ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली गेली परंतु, आजचे सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील दिसत नाही. कांदा, हरभरा, सोयाबीन उत्पादक संकटात आहे. दुधाचा खर्च वाढला आहे. जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे. एवढा मोठा कृषीप्रधान देश, पण देशाला कृषिमंत्री नाही. देशाला शेतीमंत्री नसेल, तर देश कसा चालेल? देशातील शेतकऱ्यांनी आपल्या कष्टातून देशाची भूक भागविली आहे. हे लक्षात ठेवा. आज तुमच्या या आक्रोश मोर्चाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. यातून नक्कीच जागृती होऊ शकते व परिवर्तन होऊ शकते, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला

अधिक वाचा  साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी : शरद पवार

कोल्हे म्हणाले, सध्या देशाला कृषिमंत्री नाही. शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून काम करताना अमीट ठसा उमटविला. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांना न्याय देण्याचा कायमच प्रयत्न केला. आज मात्र माझ्या बळीराजाला वाली राहिलेला नाही.

तर तुम्ही पडाल!

संजय राऊत म्हणाले, अमोल कोल्हे यांनी बेइमानी केली नाही. ते गद्दार झाले. नाहीत. म्हणून त्यांच्या पराभवाचा विडा उचलता काय? महाराष्ट्राने कायम निष्ठावानांना साथ दिलेली आहे. बेइमानांना नाही, हे लक्षात ठेवा. आता ओवाळण्या बंद झाल्या पाहिजेत. जो आमच्या मूळावर आला, त्याला त्याची जागा दाखविली पाहिजे आमच्या पाडापाडीत पडाल, तर पडाल, असा टोमणाही त्यांनी अजितदादांनी लगावला. मी बाबरी प्रकरणातला आरोपी असून, आत्तापर्यंत दहा वेळा सीबीआय कोर्टासमोर हजर राहिलो आहे तुम्ही मला काय सांगता, असा टोलाही राऊत यांनी भाजपाला लगायला

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love