gtag('js', new Date());
पुणे -ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या दृष्टीने ट्रस्ट स्थापन करण्याचे चे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ह्या माध्यमातून गरजूना मदत दिली जाईल अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक च्या पुणे केंद्राच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे...
पुणे--काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे मनोरूग्ण झाले असून रोज ते  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत दर्जाहीन वक्तव्य करीत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज  टिळक चौकात  नाना पाटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, कॉँग्रेसची संपूर्ण देशात...
पुणे--पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर जवळील २४ वा मैल येथे रविवारी संध्याकाळी ३ वाहनांमध्ये हा विचित्र आणि भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. पाचजण जखमी झाले आहे. ट्रक, दुचाकी आणि चारचाकी कारमध्ये हा विचित्र अपघात घडला.एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या एका कारला आणि...
पुणे—मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर जे भाषण केले ते आधीच्या आणि आताच्या दसऱ्याला केलेल्या भाषणासारखे होते. त्यांचा आपण कसे चुकले हे दाखवण्यासाठीचा थयथयाट सगळ्या भाषणांमध्ये सारखा आहे. निराशा व्यक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून ही भाषा योग्य नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. परंतु,  यांची भाषा ही सारखी तोडेन, ठोकेन,...
पुणे- पुण्यातील बालेवाडी येथून भरदिवसा दुचाकीवरून अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला आहे. चिमुरड्याला अपहरणकर्ताच सोडून पसार झाला आहे. त्यानंतर तो सापडला आहे.स्वर्णव सतिश चव्हाण (वय ४ वर्षे) असे अपहरण झालेल्या या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुणे--केंद्र सरकारने २०१३ साली आणलेल्या भुमिअधिग्रहण कायद्यातील दुरुस्तीला विरोध असतानाही महाविकास आघाडीच्या सरकारने दोन अध्यादेशांद्वारे कायद्यात दुरुस्ती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसानभरपाई मिळत नसून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या तसेच किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा याची सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पत्रकार परिषदेत...