gtag('js', new Date());
सत्यजित तांबे भाजपात आल्याने काही फरक पडणार नाही
संगमनेर: आमदार सत्यजित तांबे यांच्या संभाव्य भारतीय जनता पक्ष (भाजप) प्रवेशाच्या चर्चांना सध्या उधाण आले असतानाच, माजी  खासदार सुजय विखे पाटील यांनी यावर मोठे आणि स्पष्ट वक्तव्य केले आहे. तांबे भाजपमध्ये आले तरी संगमनेर तालुक्यातील स्थानिक पातळीवरील संघर्ष कायम राहील, असे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.सुजय विखे म्हणाले, "संगमनेर तालुक्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही." भविष्यात...
महिला आयोगाने न्याय देण्याची भुमिका स्विकारली नाही हे दुर्दैव
पिंपरी - वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चिघळत असताना दोन-तीन दिवस महिला आयोगाचा त्यात लक्ष घालण्याचा रोल दिसत नव्हता. राजकीय भेद बाजूला ठेवून त्यांनी पुढे यायला पाहिजे होते. याप्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची भुमिका स्विकारायला पाहिजे होती. मात्र, दुर्दैवाने ती आम्हाला दिसली नाही. हे राज्याचे, महिलांचे दुर्दैव, आहे, अशी टीका काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा...
Bavdhan police issues 'look out' notice against Nilesh Chavan
पिंपरी(प्रतिनिधी) - वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असणारा नीलेश चव्हाण याच्या मागावर पिंपरी - चिंचवडसह पुणे पोलीसही आहेत. मात्र, दोन्ही पोलीस दलांना गुंगारा देत चव्हाण मोकाट फिरत आहे. आता चव्हाण हा परदेशात पळून जाऊ नये यासाठी त्याच्या विरोधात पिंपरी - चिंचवड पोलीसांनी 'लुक आऊट' नोटीस काढली आहे.नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) याच्याविरोधात रविवारी (दि. २५) बावधन पोलिसांनी...
सुजय विखे यांनी केली अजित पवारांची पाठराखण
अहिल्यानगर : अजित पवार यांच्या एका लग्नसोहळ्यातील फोटोवरून उठलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अजितदादांची पाठराखण करत, टीका करणाऱ्या विरोधकांवर  "ज्यांना लग्नाची पत्रिकाच येत नाही, म्हणून त्यांचा त्रागा होत असल्याची टीका केली. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींवरील अनावश्यक टीकेला त्यांनी उपहासाने उत्तर दिले.'होतकरू नेतृत्व' आणि नैसर्गिक फोटोसुजय विखे पाटील यांनी अजित पवारांना "होतकरू नेतृत्व" असे संबोधत त्यांची पाठराखण...
अहमदनगर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना ७० हजार मताधिक्याने दणदणीत विजय मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त करत, "कडू बोलणारेच खरे कामाचे, गोड बोलणारे फक्त बोलून निघून जातात," असा सणसणीत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला. मतदारांनी प्रचाराविना दिलेल्या मताधिक्यामुळे आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी नमूद केले.निळवंडे जलपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सुजय विखे पाटील यांनी...
नारी शक्तीचा सन्मान एक ऊर्जावान स्त्रोत : शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांचे मत
पुणे(प्रतिनिधि)--'क्षमा, शौर्य, धर्म आणि नीती या तत्वांचा समावेश असलेला हा पुरस्कार एक ऊर्जा आहे. आपापल्या क्षेत्रात अमूल्य योगदान देऊन समाजाला प्रेरणा देणाऱ्या नारीशक्तीचा हा विशेष सन्मान आहे. मूल्य, मातृत्वप्रेम आणि वारकरी संप्रदायाचे हे प्रतीक आहे. दूरदृष्टी ठेवून विश्वधर्मी डॉ. कराड यांनी नारीशक्तीच्या गौरवासाठी सुरू केलेल्या या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी आधुनिक काळात नव्याने सशक्तीकरणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली,' असे...