gtag('js', new Date());
पाकिस्तानचे भारताला लक्ष्य करणारे 'डिजिटल' षड्यंत्र उघड
नवी दिल्ली - एका गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तानच्या लष्कराने भारतामध्ये अंतर्गत फूट पाडण्यासाठी एक मोठे 'डिजिटल' षड्यंत्र रचले आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, पाकिस्तानी लष्कराने ३०० तज्ञांची एक विशेष सोशल मीडिया टीम तयार केली आहे.या पथकातील सर्व सदस्य भारतीय भाषांमध्ये पारंगत आहेत आणि त्यांना मासिक वेतनावर नेमण्यात आले आहे. या संघाचे मुख्य उद्दीष्ट्य भारतातील हिंदू समाजात...
पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा
पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC)  कारभारातील अनियमितता आणि गैरव्यवहारांबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पणनमंत्री जयकुमार रावळ यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान संचालक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि गैरकारभार झाल्याच्या तक्रारी...
जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे नवे अध्यक्ष
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar faction) प्रदेशाध्यक्षपदी  मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेले जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा  दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात  अनेक चर्चांना उधाण आले असून, पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी घोषणा केली आहे. ही घोषणा...
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वाकडे: डिसेंबर २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार
महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा आणि मुंबई-पुणे प्रवासाला नवी दिशा देणारा बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प (Mumbai-Pune Expressway 'Missing Link' project) आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, डिसेंबर २०२५ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे...
बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल
मुंबई : विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधानभवन येथे राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी गठित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय...
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: ११ आरोपींविरोधात तब्बल १६७० पानांचे दोषारोपपत्र दाखल
पुणे : पुण्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिच्या पतीसह सासरच्या मंडळी आणि इतर अशा एकूण अकरा आरोपीं विरोधात पुणे न्यायालयात (Pune Court) तब्बल १,६७० पानांचे सविस्तर दोषारोपपत्र  (charge sheet) दाखल करण्यात आले आहे....