तालिबानच्या ड्रोन हल्ल्यांनी पाकिस्तान हादरला; बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण एअर स्ट्राईक

अफगाणिस्तान-पाकिस्तान तणाव (Afghanistan-Pakistan conflict)
अफगाणिस्तान-पाकिस्तान तणाव (Afghanistan-Pakistan conflict)

नवी दिल्ली – अफगाणिस्तान  आणि पाकिस्तानमधील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून, तालिबानच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेत शिरून मोठा हल्ला चढवला आहे. अफगाण तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, त्यांच्या वायुसेनेने रात्रभर पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा (केपी) प्रांतात अनेक ठिकाणी भीषण ड्रोन हल्ले केले आहेत. या कारवाईत इसिस (ISIS) आणि अफगाणिस्तानविरोधी कारवाया करणाऱ्या तळांना यशस्वीपणे लक्ष्य केल्याचा दावा तालिबानने केला असून, यामुळे संपूर्ण पाकिस्तान दहशतीच्या छायेखाली आहे.

तालिबानच्या दाव्यानुसार, हे हल्ले प्रामुख्याने गुलिस्तान, शकार आब आणि कंबर खेल या भागांतील दहशतवादी तळांवर करण्यात आले. या विशिष्ट ठिकाणांहून अफगाणिस्तानच्या हद्दीत हल्ल्यांचे नियोजन केले जात होते, असा आरोप तालिबानने केला आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या मोहिमेत सर्व पूर्वनियोजित लक्ष्यांचा अचूक वेध घेण्यात आला असून ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली आहे. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा गेल्या अनेक महिन्यांपासून सीमा ओलांडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

अधिक वाचा  Pune Municipal Corporation Election : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 'महाविकास आघाडी' म्हणूनच लढणार :अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही

या युद्धामागील पार्श्वभूमी पाहता, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ले केले होते, ज्यामध्ये महिला आणि मुलांसह अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप तालिबानने केला होता. या हल्ल्याचा सूड घेण्याचा इशारा तालिबानने यापूर्वीच दिला होता आणि ही ताजी कारवाई त्याचाच एक भाग मानली जात आहे. फेब्रुवारी २०२६ पासून दोन्ही देशांच्या सीमांवर सतत लष्करी चकमकी आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत. तालिबानने स्पष्ट शब्दात बजावले आहे की, ते आपल्या देशाच्या सुरक्षा आणि स्थिरतेविरुद्ध कोणताही धोका सहन करणार नाहीत आणि गरज पडल्यास आपली पूर्ण लष्करी ताकद वापरण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

या ताज्या ड्रोन हल्ल्यांनंतर पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारची स्थिती अत्यंत बिकट झाली असून सत्ता त्यांच्या हातातून निसटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील लष्कराला या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. एका बाजूला तालिबानचे हल्ले आणि दुसरीकडे पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळे देश कंगालीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाकिस्तानमध्ये सध्या पीोजेके (POJK) मधील जनतेचा तीव्र विरोध, पिण्याच्या पाण्याची समस्या, पिठाचा तुटवडा आणि सिंधू जल करारावरून सुरू असलेली ओरड यामुळे अंतर्गत अराजकता माजली आहे. भारताच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला आता स्वतःच्या घरातच अनेक शत्रूंनी वेढले आहे.

अधिक वाचा  नव भारतासाठी स्त्रीयांना सक्षम करावे : पद्मविभूषण डॉ. माशेलकर : द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा शुभारंभ

विशेषज्ञांच्या मते, जर हा संघर्ष असाच वाढत राहिला तर संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेवर आणि स्थिरतेवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. पाकिस्तानच्या बाजूने अद्याप या हल्ल्यांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने एक नवीन फतवा काढला असून, सरकारी कर्मचारी आणि लष्करी जवानांना स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानमध्ये झालेला हा हवाई हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात असून, यामुळे पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love