महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासात [History of India] छत्रपती शिवाजी महाराजांचा [Chhatrapati Shivaji Maharaj] राज्याभिषेक [Coronation] हा एक सुवर्णक्षण मानला जातो. आजपासून ३५१ वर्षांपूर्वी, ६ जून १६७४ रोजी, रायगडावर [Raigad] संपन्न झालेला हा सोहळा केवळ एका राजाचे सिंहासनारोहण नव्हते, तर एका पराभूत मानसिकतेतून बाहेर पडून स्वाभिमानाकडे वाटचाल करणाऱ्या हिंदू समाजाच्या [Hindu society] पुनरुत्थानाचा तो आरंभबिंदू होता. ही घटना केवळ भूतकाळात बंदिस्त ठेवण्यासारखी नसून, वर्तमानात राष्ट्राभिमान [National pride], सांस्कृतिक अस्मिता [Cultural identity] आणि नेतृत्वदायी मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रेरणास्थान ठरावी लागेल.
स्वराज्याची [Swarajya] अभूतपूर्व स्थापना अनेक शतकांपासून हिंदुस्थानात कोणतेही सार्वभौम हिंदू राज्य [Hindu Kingdom] अस्तित्वात नव्हते. दिल्ली (इंद्रप्रस्थ) [Delhi (Indraprastha)], कर्णावती [Karnavati], देवगिरी [Devagiri], उज्जैन [Ujjain], विजयनगर [Vijayanagar] यांसारखी पूर्वीची हिंदू साम्राज्ये [Hindu Empires] लयाला गेली होती आणि बहुतांश हिंदू राजांना मुघलांचे [Mughals] किंवा इतर मुस्लिम सत्ताधाऱ्यांचे मांडलिकत्व पत्करावे लागत होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य [Hindavi Swarajya] उभे केले. त्यांनी केवळ भूभाग जिंकला नाही, तर देशप्रेम [Patriotism] आणि धर्मप्रेम [Religious devotion] जागवून सामान्य माणसाला असामान्य बनवले. १६४६ मध्ये वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तोरणा किल्ला [Torna Fort] जिंकून त्यांनी आपल्या लष्करी मोहिमांना सुरुवात केली. गनिमी काव्याने [Guerrilla warfare] मुघलांसह अनेक परकीय आणि अत्याचारी सत्तांशी झुंज देत, दुर्गम सह्याद्रीचा [Sahyadri] आणि गडकिल्ल्यांचा [Forts] आधार घेत त्यांनी हे स्वराज्य निर्माण केले. त्यांच्याकडे सुमारे ३७० किल्ले [Forts] होते आणि एक लाख सैनिकांचे स्थायी सैन्य [Standing Army] होते, ज्यात पायदळ [Infantry] आणि घोडदळाचा [Cavalry] समावेश होता. ६० हून अधिक युद्धनौका असलेले आरमार [Navy] उभारणारे ते पहिले भारतीय राजा होते.
रायगड: स्वराज्याची भक्कम राजधानी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून शिवरायांनी किल्ले रायगडाची [Raigad Fort] निवड केली. हिरोजी इंदुलकर [Hiroji Indulkar] यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भव्य राजसभा [Royal Court], अष्टप्रधानांची कार्यालये [Offices of Ashtapradhan], राणीमहाल [Queen’s Palace], नगारखाना [Drum House], शस्त्रागार [Armory], कोषागार [Treasury], गंगासागर [Gangasagar] आणि कुशावर्त तलाव [Kushavarta Lake], सुरक्षित बाजारपेठ [Safe Marketplace] आणि मजबूत तटबंदी [Strong Fortification] उभारली गेली. रायगड खऱ्या अर्थाने एक भक्कम, सुरक्षित आणि सुसज्ज राजधानी बनला.
पवित्र राज्याभिषेक सोहळा आणि धार्मिक विधी राज्याभिषेकासाठी हिंदुस्थानातील महान पंडित गागाभट्ट [Gagabhatt] यांच्यासह अनेक विद्वान, अष्टप्रधान [Ashtapradhan], सरदार [Sardars], मनसबदार [Mansabdars], साधुसंत [Saints], परकीय सत्तांचे प्रतिनिधी [Representatives of foreign powers] आणि महाराजांचे आप्तजन रायगडावर [Raigad] जमले होते. राज्याभिषेकापूर्वी शिवरायांनी राज्यातील देवस्थाने [Temples] आणि साधुसंतांना दानधर्म [Charity] केला. गागाभट्टांनी ‘राज्याभिषेकप्रयोग’ [Rajyabhishek Prayog] हा ग्रंथ रचला आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ (६ जून १६७४) [June 6, 1674] हा शुभदिवस निश्चित केला. हा दिवस विक्रम संवत [Vikram Samvat] १७२९ नुसार होता.
राज्याभिषेकाच्या एक आठवड्यापूर्वीच धार्मिक विधी [Religious rituals] सुरू झाले. यामध्ये गणेशपूजन [Ganesha Puja], मुंज [Upanayana], तुलादान [Tuladan], समंत्रक विवाह [Vedic marriage], ग्रहयज्ञ [Grahayajna] असे अनेक विधी पार पडले. गागाभट्टांच्या [Gagabhatt] नेतृत्वाखाली सप्तसरितांच्या तीर्थाने [Holy waters from seven rivers] शिवाजी महाराजांवर अभिषेक [Abhisheka] करण्यात आला. त्यानंतर शिवराय सुवर्णसिंहासनावर [Golden Throne] स्थानापन्न झाले. त्यांच्या खांद्यावर धनुष्यबाण [Bow and Arrow], कमरेस भवानी तलवार [Bhavani Sword] होती आणि अष्टप्रधान [Ashtapradhan] राजचिन्हे [Royal Emblems] घेऊन उभे होते. वेदमंत्रांच्या [Vedic chants] घोषात धार्मिक विधी पार पडले आणि अष्टप्रधानांनी [Ashtapradhan] सुवर्णफुले [Golden flowers], होन [Hon (gold coin)], रौप्य [Silver] व ताम्र नाण्यांचा [Copper coins] अभिषेक केला. परराज्यांतील प्रतिनिधींनी नजराणे [Gifts] अर्पण केले आणि कवींनी स्तुतिकाव्ये [Eulogies] सादर केली. यानंतर शिवराय भव्य सुवर्णअंबारीतून [Golden Palanquin] वाजतगाजत वाडेश्वराच्या [Vadeshwar] दर्शनासाठी निघाले. याच दिवशी ‘राज्याभिषेक शक’ [Rajyabhishek Shak] (शिव शक) [Shiv Shak] या नव्या कालगणनेची [New Calendar] सुरुवात करण्यात आली आणि शिवराई सुवर्णनाण्यांची [Shivrai gold coins] टकसाल [Mint] सुरू झाली. तांत्रिक दृष्टिकोनातून, सार्वभौम राजा [Sovereign King] म्हणून विविध तह [Treaties], करार [Agreements], इनाम [Grants], नेमणुका [Appointments] इत्यादींना विधीसंमततेसाठी राज्याभिषेक [Coronation] आवश्यक होता.
सुराज्याचा [Good Governance] आदर्श आणि शिवरायांचा लोककल्याणकारी वारसा शिवरायांनी महिलांच्या सुरक्षेसाठी [Women’s safety] कठोर धोरणे राबवली. त्यांनी प्रशासनात जबाबदारीची भावना जागृत केली आणि भ्रष्टाचारावर [Corruption] कठोर कारवाई केली. ‘स्वदेश [Own country], स्वधर्म [Own religion], स्वभाषा [Own language], स्वसमाज [Own society]’ यांचा उत्कर्ष हेच त्यांचे ध्येय होते. म्हणूनच त्यांना ‘रयतेचा राजा’ [King of the common people] म्हटले गेले. त्यांचे निष्कलंक चारित्र्य [Impeccable character] आणि लोककल्याणकारी कार्य [Pro-people work] आजही प्रेरणादायी ठरले आहे.
स्वराज्य ते साम्राज्य मराठ्यांचा संघर्ष [Maratha struggle] शिवाजी महाराजांच्या [Shivaji Maharaj] निधनानंतर औरंगजेब [Aurangzeb] स्वराज्यावर चालून आला. परंतु राष्ट्रप्रेमाने [Nationalism] भारलेल्या मराठ्यांनी [Marathas] २७ वर्षे संघर्ष करून औरंगजेबाला [Aurangzeb] महाराष्ट्रातच [Maharashtra] मृत्युमुखी पाडले. त्यानंतर अठराव्या शतकाच्या प्रारंभी शाहू महाराजांच्या [Shahu Maharaj] नेतृत्वात हिंदवी स्वराज्य [Hindavi Swarajya] साम्राज्यात [Empire] परिवर्तित झाले. बाळाजी विश्वनाथ [Balaji Vishwanath], बाजीराव पेशवे [Bajirao Peshwa], अहिल्याबाई होळकर [Ahilyabai Holkar], महादजी शिंदे [Mahadji Shinde] यांसारख्यांनी यात मोलाचे योगदान दिले. अब्दालीच्या [Abdali] आक्रमणाच्या काळातही मराठ्यांनी [Marathas] राष्ट्ररक्षणासाठी [National defense] झुंज दिली. १७५७ मध्ये अब्दालीला [Abdali] पराभूत करून अटकेपार भगवा फडकावला [Maratha flag beyond Attock]. पानिपतच्या लढाईत [Battle of Panipat] (१७६१ साली) एक लाख मराठ्यांनी [Marathas] बलिदान दिले असले तरी, अब्दाली [Abdali] पुन्हा कधीच दिल्लीपर्यंत [Delhi] पोहोचू शकला नाही. १२ फेब्रुवारी १७७१ रोजी महादजी शिंदे [Mahadji Shinde] व इतरांनी दिल्ली [Delhi] जिंकून पुढील ३० वर्षे दिल्लीचे संरक्षण केले.
शिवाजी महाराजांनी [Shivaji Maharaj] उभारलेले स्वराज्य [Swarajya] आणि नंतरचे हिंदवी साम्राज्य [Hindavi Empire] हे हिंदू समाज [Hindu society], संस्कृती [Culture] आणि राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक ठरले. हिंदूंना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढून शक्तिशाली बनवले. जिझिया कर [Jizya tax], धर्मांतरे [Conversions], मठ-मंदिरांचा विध्वंस [Destruction of monasteries and temples] थांबवला गेला. हिंदू कला [Hindu art], संस्कृती [Culture] आणि अस्मिता [Identity] यांचा विकास झाला. हे संपूर्ण कार्य हिंदुस्थानसाठी [Hindustan] नवसंजीवनीसमान ठरले.
आजच्या भारतासाठी शिवराज्याभिषेकाचा अर्थ आज, भारत [India] विविध स्वरूपाच्या आव्हानांशी झुंजत असताना – जसे की धर्मावर आधारित तुष्टीकरण [Religious appeasement], भाषिक-प्रांतीय फुटीरता [Linguistic and provincial separatism], संस्कृतीविरोधी जागतिकीकरण [Anti-cultural globalization] आणि तरुणाईत आत्मविश्वासाचा अभाव [Lack of confidence in youth] – या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा [Chhatrapati Shivaji Maharaj] राज्याभिषेक [Coronation] केवळ एक ऐतिहासिक घटना नाही. तो ‘स्व’च्या [Self] शोधाची आणि स्थापनेची प्रतीकात्मक पुनर्रचना आहे. शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे ‘स्वराज्य’ [Swarajya] हा केवळ भूभाग नव्हता, तर स्वधर्म [Own religion], स्वसंस्कृती [Own culture], स्वभाषा [Own language], स्वाभिमान [Self-respect] आणि स्वकर्तव्याची [Own duty] स्थापना होती.
आज देशात राज्य आहे, पण राज्याभिषेकासारखा राष्ट्राभिषेक [National Coronation] म्हणजेच एका जागृत, स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारताची [Self-reliant India] नवी घोषणा करणे आवश्यक आहे. जेव्हा शिवरायांनी [Shivaji Maharaj] स्वराज्य [Swarajya] स्थापन केले, तेव्हा ते परकीय गुलामगिरीतून [Foreign subjugation] मुक्तीचे प्रतीक होते. आज आपण मानसिक गुलामगिरीतून [Mental slavery] मुक्त होण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली पाहिजे. जिथे आपले आदर्श [Ideals], शिक्षण [Education], इतिहास [History], मूल्ये [Values], सण [Festivals], भाषा [Language], कला [Art] हे सर्व पाश्चिमात्य प्रमाणांवर नव्हे, तर स्वसंस्कारांवर [Own culture and values] आधारित असावेत.
शिवाजी महाराजांचा [Shivaji Maharaj] राज्याभिषेक [Coronation] हा केवळ सिंहासनारोहण नव्हता, तर हिंदू समाजाच्या [Hindu society] पुन्हा उभारीचा प्रारंभबिंदू होता. आजच्या पिढीने याकडे सार्वकालिक प्रेरित करणाऱ्या मूल्यसंहितेप्रमाणे [Code of values] पाहण्याची गरज आहे. प्रत्येक भारतीयाच्या [Indian] मनात ‘मी कोण आहे? माझा स्वधर्म [My own religion], स्वसंस्कृती [My own culture] काय आहे?’ या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया म्हणजेच आजचा राज्याभिषेक [Coronation] आहे.