तर मग फिल्म इंडस्ट्रीपण बंद करणार का? : पुनीत बालन यांचा अभिनेत्री शुभांगी गोखले यांना सवाल :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यापुढे बापाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी रथाना बैलांचा वापर करणार नाही

पुनीत बालन यांचा अभिनेत्री शुभांगी गोखले यांना सवाल
पुनीत बालन यांचा अभिनेत्री शुभांगी गोखले यांना सवाल

पुणे(प्रतिनिधी)— सार्वजनिक गणेशोत्सवात गैर प्रकार चाललात, त्यामुळे हे उत्सव बंद करावेत अशी टिप्पणी करणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांना हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून अश्लीलता, व्यसनाधिता अशा गोष्टी दाखविल्या जातात. तर मग फिल्म इंडस्ट्रीपण बंद करणार का? असा सवाल करत बालन यांनी शुभांगी गोखले यांना टोला लगावला आहे. दरम्यान, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यापुढे बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी रथाना बैलांचा वापर करणार नाही अशी महत्वपूर्ण घोषणा बालन यांनी केली आहे. या निर्णयामुळे तब्बल १३३ वर्षांपासूनची परंपरा आता खंडित होणार असली तरी मुक्या प्राण्याचे हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बालन यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती-सुधीर मुनगंटीवार

सार्वजनिक गणेशोत्सवात गैर प्रकार चाललात, त्यामुळे हे उत्सव बंद करावेत अशी टिप्पणी करणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले केली होती, याबाबत बालन यांना विचारणा केली असता ते म्हणाले, त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शुभांगीताईंनी स्टंट केला. आमचं त्यांना निमंत्रण आहे.  त्यांनी पुण्यात यावे.  येथील सर्वच गणेश मंडळं कसे धार्मिक, सामाजिक, आरोग्याचे उपक्रम राबवितात हे पाहावे. मी स्वतः चित्रपट निर्माता आहे.  चित्रपटाच्या माध्यमातून अश्लीलता, व्यसनाधिता अशा गोष्टी दाखविल्या जातात. तर मग फिल्म इंडस्ट्रीपण बंद करणार का? असा सवाल बालन यांनी उपस्थित केला.

दरम्यान, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या उत्सव मंडपाचे वासापुजन सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पुनीत बालन म्हणाले. की यंदाच्या वर्षी वरद विघ्नेश्वर वाडा ही सजावट गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.  यावर्षी १८९२ पासून चालत आलेली परंपरा प्रथमच बदलून भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीत बैल जोडी न वापरण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.  विसर्जन मिरवणूकीला विलंब होतो, त्यामुळे रथ ओढणाऱ्या बैलांचे हाल होतात. मुक्या प्राण्यांचे हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगमन मिरवणुकीत बाप्पाचा रथ ट्रस्टचे कार्यकर्ते व भक्त ओढतील व विसर्जन मिरवणुकीसाठी एक खास रथ तयार करण्यात येणार आहे त्यामध्ये श्रींची मिरवणूक निघणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.

अधिक वाचा  मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले की कुठल्याही कामाची सुरुवात आपण श्री गणेशाच्या आराधनेने करतो. अखंड हिंदुस्तानाचे श्री गणेशा हे  श्रद्धास्थान आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज साता समुद्रापार पोहचला आहे. गणेशोत्सव हा कुठल्याही जाती धर्मापुरता मर्यादित नसून सर्वजण उत्साहाने या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे येणारा उत्सव हा सगळ्यांनी उत्साहात साजरा करूयात. या उत्सवासाठी पुणे पोलिसांची जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

झोन वनचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्यासह तुळशीबाग गणेश मंडळाचे अध्यक्ष विकास पवार,  कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

अधिक वाचा  मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट : एकजण ताब्यात

———————————————

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love