पुणे (प्रतिनिधी) — केवळ विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही, आपण साधू संत नाहीत. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचे राजकारण (Politics of Addition) करणारे लोक आहोत. याच बेरजेच्या राजकारणातून आपण भाजपा (BJP) आणि एनडीएबरोबर (NDA) जाण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील (Pune) बालेवाडी क्रीडा संकुलात (Balewadi Sports Complex) आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) दारुण पराभव, ‘लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यामागील कारण आणि भारतीय जनता पक्षासोबत (भाजप) (Bharatiya Janata Party) (महायुती) (Mahayuti) जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत अजित पवार यांनी प्रथमच अत्यंत स्पष्टपणे आपले मत मांडले.
बहुमताचा अभाव आणि आघाडीचे राजकारण अजित पवार यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या स्थापनेच्या दिवसाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “मला आजही १० जून १९९९ (June 10, 1999) हा दिवस आठवतो. शरद पवार (Sharad Pawar) आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली”. आपल्या पक्षाला राज्यात कधीही बहुमत मिळाले नाही हे मान्य करावे लागेल. आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावे लागले, कारण आता राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. केंद्रातही यूपीए (UPA) किंवा एनडीए (NDA) यांसारख्या आघाड्या कराव्या लागल्याचे उदाहरण त्यांनी दिले. “सर्वांनी साथ दिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे”, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपासोबत जाण्यामागील कारण आणि ‘बेरजेचे राजकारण’ भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत बोलताना ते म्हणाले, “२०१९ (2019) साली आपल्या पक्षाने शिवसेना (Shiv Sena) पक्षाबरोबर सरकार स्थापन केले होते. तेव्हा देखील आपण सत्तेसाठी काही तडजोडी केल्या होत्या”. “शेवटी विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही. आपण साधू संत नाहीत. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचे राजकारण करणारे लोक आहोत आणि याच बेरजेच्या राजकारणातून आपण भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनीही एकेकाळी एनडीएला साथ दिल्याची उदाहरणे त्यांनी दिली. राज्याचा विकास झाला पाहिजे हेच आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
लोकसभेतील पराभव आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा जन्म अजित पवारांनी, लोकसभेत आपला दारूण पराभव झाल्याचेही मान्य केले. लोकसभेच्या निवडणुकीत आपला ७५ टक्के पराभव झाला. आपली फक्त एक जागा निवडून आली असे आकडेवारीसह त्यांनी सांगितले. या पराभवानंतर आपण कुठे कमी पडलो, काय चुकले यावर विचार केला. याच आत्मचिंतनातून ‘लाडकी बहीण’ योजना पुढे आली, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, दर महिन्याच्या शेवटी आदिती (Aditi) त्यांना लाडक्या बहिणींचे पैसे द्यायचे असल्याचे सांगायची. या योजनेसाठी ४० ते ४५ हजार कोटी रुपये लागतील, असा मोठा आर्थिक विचार करण्यात आला आहे, जेणेकरून महिलांच्या हातात पैसे मिळतील. विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक न्याय विभागाच्या निधीवरून आरोपांना प्रत्युत्तर सामाजिक न्याय विभागाचे (Social Justice Department) बजेट कमी केल्याचा आरोप आपल्या सरकारवर होत असल्याचे अजित पवार यांनी मान्य केले. या आरोपांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विचारू शकता. यंदाचा ७ लाख २० कोटींचा अर्थसंकल्प (Budget) सादर करताना महायुतीने मागच्या बजेटपेक्षा अनुसूचित जातीला (Scheduled Castes) ४१ टक्के निधी वाढवून दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आदिवासी विभागालाही (Tribal Department) ४१ टक्के निधी वाढवून दिल्याची माहिती त्यांनी दिली, परंतु ही माहिती सर्वांसमोर येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मग मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का? निधी वाटपावरून होणाऱ्या टीकेवरही अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पैशांचं सोंग करता येत नाही, हे मी नेहमीच सांगतो. “राज्याच्या उत्पन्नात देखील वाढ झाली पाहिजे. त्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतात”. “पण कधीकधी बातम्या येतात की अजित पवार पैसे सोडत नाही. मग मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का?” असा सवाल करत त्यांनी टीकाकारांना टोला लगावला.
अजित पवार यांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे काम करण्याची ग्वाही दिली. काही जण जाणीवपूर्वक सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) पार्श्वभूमीवर त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव (Shivaji Maharaj), शाहू (Shahu Maharaj), फुले (Jyotirao Phule), आंबेडकर (B. R. Ambedkar) यांच्या विचाराने चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.