हुंड्याच्या बळी, छळाच्या कहाण्या : एका सुनेची साक्ष आणि दुसऱ्याचा जीव घेणारा अन्याय

Dowry victims, stories of torture
Dowry victims, stories of torture

पुणे(प्रतिनिधि)—वैष्णवी हगवणे या २४ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद प्रकरणातील मृत वैष्णवी हिच्या मोठ्या जावेने आणि हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप यांनीही सासरे, सासू, दीर आणि नणंद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंबातील पती वगळता त्यांच्या नणंद करिश्मा हगवणे, दीर शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे  त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते असा आरोप केला आहे. मयुरी जगताप यांनी राजकीय दबाव नसता आणि पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती, तर वैष्णवी आज जिवंत असती असे त्यांनी सांगितले.

मयुरी यांनी सांगितले की, हगवणे कुटुंबीय छोट्या छोट्या कारणांवरून त्यांना त्रास देत असत. चारित्र्यावर संशय घेतला जात असे आणि पतीला त्यांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला जात असे. सासरे राजेंद्र हगवणे तर नेहमी पतीला मयुरीला सोडून देण्यास सांगत असत. मात्र, मयुरी यांचे पती त्यांना नेहमी साथ देत राहिले. मयुरी सांगतात की, पतीच्या पाठिंब्यामुळेच त्या आज जिवंत आहेत. याच संदर्भात बोलताना, जर वैष्णवीलाही असाच पाठिंबा मिळाला असता, तर कदाचित ती आज वाचली असती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  कमिटीच्या माध्यमातून करणार लग्नसमारंभासाठीआचारसंहितेची जनजागृती : मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

हगवणे कुटुंबातील चौघेही मिळून मयुरीवर हल्ला करत असत, विशेषतः जेव्हा त्यांचे पती घरी नसायचे. त्यांना खोलीत आणि रस्त्यावरही मारहाण केली जात असे. रस्त्यावर मारहाण होत असतानाही कोणी मदतीला धावले नाही किंवा तक्रार केली नाही, कारण हगवणे कुटुंबाचा दबदबा खूप मोठा होता आणि लोक त्यांना घाबरत असत. एका घटनेत, त्यांचा दीर शशांक हगवणे याने मयुरीचा मोबाईल हिसकावून घेतला, कारण त्यात कुटुंबाने दिलेल्या शिवीगाळीचे रेकॉर्डिंग होते. या मोबाईलसाठी मयुरी रस्त्यावर धावल्या, त्यांचे कपडे फाटले होते. पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि शशांकने मोबाईल नसल्याचे खोटे सांगितले.

याच कुटुंबातील दुसरी सून, वैष्णवी, हिच्यावरही असाच अन्याय आणि अत्याचार झाल्याचा आरोप आहे. मयुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या माहेरच्यांकडून मोठ्या प्रमाणात हुंड्याची मागणी केली होती. यामध्ये फॉर्चुनर गाडी, कोट्यावधी रुपये, ५१ तोळे सोनं आणि चांदी यांचा समावेश होता. विशेषतः फॉर्च्युनर गाडीची मागणी त्यांनी बैठका घेऊन केली होती, त्यांना एमटॉर गाडी नको होती. ब्रँडेड वस्तूंचाही हट्ट होता, जसे की हजारांचा गॉगल आणि ब्रँडेड घड्याळ. चांदीच्या गौरया बसवण्याचीही मागणी होती, जी सामान्य रितीरिवाजापेक्षा वेगळी होती. मयुरी यांच्या आईने गौराईसाठी पैसे पाठवले होते, तरीही त्यांनी वैष्णवीकडूनच गौरया मागितल्या असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  अन् पुण्याच्या व्हिजनवर धंगेकरांनी वेळ मारून नेली

सर्वात धक्कादायक म्हणजे, वैष्णवी गरोदर असतानाही तिच्यावर अन्याय अत्याचार सुरूच होता. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. तिला उन्हात उभे केले जात असे. घरातील एका कामगाराने मयुरीला वैष्णवीला खूप त्रास दिला जात असल्याची माहिती दिली होती.

 

दुर्दैवाने, वैष्णवीचा मृत्यू झाला. कुटुंबाने सुरुवातीला फूड पॉयझनिंग झाल्याचे सांगितले. मात्र, मयुरी सांगतात की वैष्णवीने विष प्यायले. शशांक हगवणे याने वैष्णवीला हॉस्पिटलमधून सोडवण्यासाठी मयुरीच्या पतीकडून पैसे घेतले होते. या सगळ्या प्रकारामागे प्रामुख्याने शशांक हगवणे कारणीभूत असल्याचा मयुरी यांचा आरोप आहे. त्यांच्या मते, शशांकलाच या सगळ्या वस्तू आणि पैसे हवे होते, त्यामुळेच घरचे त्याच्यासाठी मागण्या करत होते.

या प्रकरणात पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली नाही, कारण हगवणे कुटुंबाचे राजकीय वजन होते. त्यांनी पोलिसांवर दबाव आणला आणि पैसे देऊन प्रकरण दाबले. त्यामुळेच वैष्णवीचा जीव गेल्याचे मयुरी यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले राजेंद्र हगवणे (सासरे), जे पदावर होते, ते अजूनही फरार आहेत आणि पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी मयुरी यांनी केली आहे.

अधिक वाचा  वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक प्रकल्प ठरेल पथदर्शी- मुरलीधर मोहोळ

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या ९ महिन्यांच्या बाळाचेही हाल होत आहेत. ते बाळ कर्वेनगर येथे एका ठिकाणी असल्याचे मयुरींना समजले होते. त्यांनी बाळाला आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मोठ्या सासऱ्यांनीही त्यांना बाळाला घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र, निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने बाळाला त्यांच्या ताब्यात दिले नाही. मयुरी यांनी अद्याप वैष्णवीच्या मुलाला पाहिलेले नाही, फक्त फोटोत पाहिले आहे असे मयूरी यांनी सांगितले. राजकीय दबाव नसता आणि योग्य वेळी पोलिसांनी कारवाई केली असती, तर वैष्णवी आज जिवंत असती अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एका कुटुंबाच्या लालसेमुळे आणि छळामुळे दोन सुनांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, एकीला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने पुन्हा एकदा समाजात महिलांवर होणारे अत्याचार आणि पोलिसांवरील राजकीय दबावाचा गंभीर प्रश्न समोर आणला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love