हा तर मोदींचा चमत्कार : अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला; ठाकरे, पवारांवरही निशाणा

हा तर मोदींचा चमत्कार : अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला
हा तर मोदींचा चमत्कार : अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला

पुणे(प्रतिनिधी)– महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळवून दिले असून, कोणती शिवसेना आणि राष्ट्रवादी खरी, हेही दाखवून दिले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर शनिवारी निशाणा साधला. एकाच दिवशी, एकाच वेळी २० लाख जणांच्या खात्यात पैसे जमा होणे, हा मोदींचा चमत्कार असल्याचा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून लगावला.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत २० लाख घरांना मंजुरीपत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण शहा यांच्या हस्ते झाले. बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ व्यासपीठावर उपस्थित होते.

अधिक वाचा  यापुढे मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं तर त्याने आपल्या गौऱ्या स्मशानात रचून याव्यात - संजय राऊत

शहा म्हणाले, माझे घर व्हायला हवे, या स्वप्नाची पूर्ती होत आहे. स्वत:चे घर, त्यात शौचालय, सोलर व आता यापुढे गॅसचा सिलेंडरही मिळेल. देशातील प्रत्येकाला घर, वीज, धान्य देणे, हीच पंतप्रधान मोदी यांची विकसित भारताची संकल्पना आहे. शौचालय देऊन गरिबांचा स्वाभिमान मोदींनी जपला आहे. कोणत्याही देशाच्या प्रमुखांनी फक्त १० वर्षात ६० लाख लोकांना घर, धान्य देण्याचे काम केले नाही. पुढची दिवाळी तुम्ही तुमच्या घरात साजरी करा.

महायुती सरकारनेही चांगले काम केले आहे. अटल सेतू हा एक चमत्कारच आहे. अनेक क्षेत्रात मोठी कामे सुरू आहेत. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले. पण, त्याबरोबरच कोणती शिवसेना खरी आहे आणि कोणती राष्ट्रवादी खरी आहे हेही दाखवून दिले आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी

जनधन खाती आम्ही सुरू केली त्यावेळी राहुलबाबा म्हणाले होते, की खाती सुरू केली, पण पैसे कुठे आहेत? आज एकाच दिवशी, एकाच वेळी २० लाख जणांच्या खात्यात पैसे जमा झाले. हा मोदींचा चमत्कार आहे राहुलबाबा, असा टोलाही त्यांनी लगावला.

फडणवीस म्हणाले, शहा यांनी बटण दाबले आणि लोकांच्या खात्यात पैसे जमा व्हायला लागलेत, मेसेजेस येत आहेत. १३ लाख ५७  हजार घरे पहिल्या व दुसऱया टप्प्यात २० लाख घरे मोदींनी दिली. १००  दिवसांत २० लाख घरांना मान्यता मिळावी सांगितले आणि फक्त ४५ दिवसात काम केले. त्यातील १०  लाख घरांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.

पवार म्हणाले, महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम केंद्र सरकार करते आहे. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. प्रत्येकाचे घराचे स्वप्न असते. पंतप्रधान मोदी २ कोटी घरे देशात देणार आहेत. त्यातील मोठा वाटा राज्याला मिळावा, असा आमचा प्रयत्न आहे.

अधिक वाचा  #Girish Gautam | कायदा बदलून काही होणार नाही, मानसिकता बदलण्याची गरज आहे - गिरीश गौतम

शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री मोदी खरी महाशक्ती आहेत. देशाला ते विकासाच्या वाटेवर घेऊन जाणार आहेत. आता या २० लाख कुटुंबात प्रेमाचा संसार फुलणार आहे. ‘जिसका कोई नही उनके मोदी और शाह है,, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love