म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर पर्यंतच्या नवीन पुलाचे लोकार्पण

म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर पर्यंतच्या नवीन पुलाचे लोकार्पण
म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर पर्यंतच्या नवीन पुलाचे लोकार्पण

संगमनेर – संगमनेर शहरातील साईनगर येथील म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर पर्यंतच्या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नागरिकांनी पुलावरून फेरफटका मारत आपला आनंद व्यक्त केला.

या आधीचा पूल निकृष्ट बांधकामामुळे कोसळल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नदी पार करण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत होता, मात्र अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हा नवीन पूल आता उभा राहिला आहे.

या नवीन पुलामुळे स्थानिक नागरिकांचे दळणवळण अधिक सोयीचे व सुरक्षित होणार असून, हा पूल परिसराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास आहे. या लोकार्पण सोहळ्याला भाजपा शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही? - संजय निरुपम