पुणे(प्रतिनिधि)- – संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा । पंढरीचा ।।
असा भाव…टाळ मृदंगाचा अखंड गजर….ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष…अन् विठुरायाच्या भेटीची आस…अशा भक्तिमय वातावरणात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या (Saint Tukaram Maharaj) पालखीने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास देहूहून (Dehu) पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान ठेवले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पालखीची विधिवत प्रस्थान पूजा आणि आरती संपन्न झाली.
संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पुण्यभूमी देहूत जणू भक्तीचा महापूरच लोटला होता. प्रस्थानाचा हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविक इंद्रायणीकाठी (Indrayani River) एकवटले होते. बुधवारी भल्या पहाटे) घंटानाद झाला. पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली. पाच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Shri Vitthal Rukmini Temple) संस्थानच्यावतीने महापूजा झाली. तर साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे (Jalindar Maharaj More), पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे (Dilip Maharaj More), विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे (Vikramsingh Maharaj More), गणेश महाराज मोरे (Ganesh Maharaj More), वैभव महाराज मोरे (Vaibhav Maharaj More) यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरातील पूजाविधी पार पडले. सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते पूजा झाली. सकाळी दहा ते बारा या वेळेत देहूकर महाराज (Dehukar Maharaj) यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
दुपारी दोनच्या सुमारास इनामदारवाड्यातून (Inamdarwada) संत तुकाराम महाराजांच्या पादुका वाजतगाजत मुख्य देऊळवाड्यात आणण्यात आल्या. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीच वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. अकलूज (Akluj) येथील मोहिते-पाटील (Mohite-Patil) व बाभूळगावकर (Babhulgaonkar) यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश करताच भाविकांचे हात जोडले गेले. मानाच्या दिंड्या देऊळवाड्यात पोहोचताच सोहळ्यातील वातावरण भारले. फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते तसेच केंद्रीय मंत्री (Union Minister) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne), राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), आमदार महेश लांडगे (Mahesh Landge), शंकर जगताप (Shankar Jagtap), सुनील शेळके (Sunil Shelke), उमा खापरे (Uma Khapre), अमित गोरखे (Amit Gorkhe), शंकर मांडेकर (Shankar Mandekar), अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या उपस्थितीत पादुकांची पूजा करण्यात आली. फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. चारच्या सुमारास पालखी खांद्यावर उचलून भजनी मंडपातून बाहेर आणताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. टाळ-मृदंगाचा स्वर टीपेला पोहोचला. मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळा सायंकाळी इनामदार वाड्यात मुक्कामी पोहोचला. त्या ठिकाणी समाजआरती झाली.
पालखीचा आकुर्डीत मुक्काम
संत तुकाराम महाराजांची (Saint Tukaram Maharaj) पालखी गुरुवारी इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे मार्गस्थ होईल. पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्गा (Angadshah Baba Dargah) येथे असेल. तसेच चिंचोली पादुका येथे अभंग, आरती होईल. निगडीत दुपारी भोजन करून पालखी सोहळा रात्री आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात (Vitthal Temple) मुक्काम करणार आहे.
हा क्षण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा – फडणवीस
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या (Jagadguru Saint Tukaram Maharaj) पालखी प्रस्थान सोहळ्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विशेषत्वाने उपस्थिती लावली. त्यांनी तुकोबांच्या पादुकांचे विधिवत पूजन आणि दर्शन घेऊन या पवित्र सोहळ्यात सहभाग नोंदवला. हा क्षण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस (Fadnavis) यांनी यावेळी भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, “भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षे आक्रमणातूनही आपल्या देव , देश आणि संस्कृतीचे रक्षण केलेले आहे”. महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशातून भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला (Pandharpur) जातात आणि वारीचे महत्त्व यात अतुलनीय असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रस्थान सोहळ्यादरम्यान काही दिंड्यांना थांबवण्यात आले होते, यावर मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) स्पष्टीकरण दिले. त्यांनी पोलिसांच्या (Police) उत्तम सुव्यवस्थेचे कौतुक केले. फडणवीस (Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, “एका वेळी सगळ्यांना सोडलं तर या ठिकाणी स्टॅम्पिड (Stampede) होईल. त्यामुळे आपणही सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला थोडे थोडे सोडावे लागतील अन्यथा या ठिकाणी त्यांची सुरक्षा वारकऱ्यांची महत्त्वाची आहे”.
या प्रसंगी त्यांनी वारकऱ्यांच्या शिस्तीचे आणि निष्ठेचे तोंडभरून कौतुक केले. मुख्यमंत्री म्हणाले, “आमचा वारकरी अशा गोष्टीची परवा करत नाही. तासभर थांबलं, अर्धा तास थांबावं लागलं तरी माऊलीच्या भेटीकरता जो अनेक किलोमीटर पायी जातो अशा प्रकारचा आमचा वारकरी हा या ठिकाणी शिस्तीत दर्शन घेईल तुम्ही काळजी करू नका”.