पुणे (प्रतिनिधी) — माझ्या राजकीय जीवनात पवार (Pawar) साहेबांनी मला भरपूर संधी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षांचा कालावधी दिला. परंतु, आता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष (State President) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंगळवारी (Tuesday) प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे (Resignation) संकेत दिले. दरम्यान, निवडणुकीनंतर तुमच्या विनंतीचा विचार करू, असे सांगत राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना तूर्तास थांबण्याचा सल्ला दिला. (Jayant Patil hints at leaving the post of state president)
पुण्यातील (Pune) बालगंधर्व रंगमंदिरात (Bal Gandharva Rangmandir) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) पक्षाचा वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) व अन्य नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करावे, अशी विनंती केली. पाटील म्हणाले, की आजवर पक्षाने मला भरपूर संधी दिली. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, की नवीन लोकांना संधी द्यावी. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असे सांगत त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे राष्ट्रवादीला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले, की जयंत पाटील यांनी दहा वर्षे संघर्षाच्या काळात संघटनेचे काम केले, याचा आनंद आहे. त्यांनी वेगळी भूमिका मांडली. नवीन पिढीला संधी द्या. पण, कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी आहे, हे याठिकाणी दिसले. प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी आम्ही या विषयावर सुसंवाद साधू. सामूहिकपणे यासंदर्भात निर्णय घेऊ. हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात नवीन चेहरे दिसले पाहिजेत. माझी खात्री आहे, की कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते आज आपल्या पक्षात आहेत. त्यांना संधी देऊयात आणि त्यांच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो, हा इतिहास निर्माण करायचा आहे. त्यासाठी सगळ्यांची तयारी असली पाहिजे.
यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. एवढे वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढताय, हे मला माहिती नाही. त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील, तर पक्षाचे ज्ये÷ नेते त्यावर विचार करतील. मात्र, जयंत पाटील यांनी कोणतेही पत्र वा राजीनामा दिलेला नाही. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसेल, तर नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीचा प्रश्न येतोच कुठे? याबाबत पक्षात सविस्तर चर्चा होईल. जयंत पाटील यांनी केवळ त्यांचा विचार मांडला आहे, याकडे सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले.