लोकशाहीचा गळा घोटून २०२९ नंतर संविधान संपवण्याचा भाजपचा कट; रोहित पवारांचा घणाघाती आरोप

रोहित पवार भाजप महायुती आरोप (Rohit Pawar BJP Mahayuti Allegations)
रोहित पवार भाजप महायुती आरोप (Rohit Pawar BJP Mahayuti Allegations)

पुणे (प्रतिनिधी)-विरोधी पक्षातील नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना फोडून लोकशाहीची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजप आणि सत्ताधारी महायुतीकडून केला जात असून, यामुळे जनतेचा लोकशाहीवरील आणि मतदानावरचा विश्वास उडू शकतो, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली. अशा प्रकारचे फोडाफोडीचे राजकारण सुरू राहिल्यास २०२९ नंतर या देशामध्ये संविधान शिल्लक राहील की नाही, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

रोहित पवार म्हणाले, जेव्हा महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षांची ताकद कमी केली जाते, तेव्हा ती केवळ पक्षाची ताकद नसून सामान्य जनतेची ताकद कमी केली जाते. सरकार सध्या चेहरे आणि पैसा बघून नियुक्त्या करत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा दावा त्यांनी केला,. भाजपला २०२९ च्या ‘डिलिमिटेशन’ कायद्याद्वारे लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ स्वतःला हवे तसे डिझाइन करायचे आहेत, जेणेकरून त्यांचे मतदान वाढेल. याच कारणासाठी ते सध्या खासदारांना फोडण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, असा आरोपही त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा संदर्भ देत केला,.

अधिक वाचा  मनसे - संभाजी ब्रिगेड यांच्यात या कारणावरून वाद पेटला

कोणताही खासदार पक्ष सोडून जाणार नाही

पक्षात दोन गट पडल्याच्या चर्चांना पूर्णविराम देताना रोहित पवार म्हणाले की, सत्तेत सहभागी होणे किंवा काँग्रेसमध्ये विलीन होणे याबद्दल कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही,. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आपल्या विचारांशी ठाम असून, कोणताही खासदार पक्ष सोडून जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, स्वतःच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले की, काहीही झाले तरी ते भाजपसोबत किंवा त्यांच्या विचारधारेसोबत कधीही जाणार नाहीत,. महायुतीमधील मित्रपक्षांबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, भाजप २०२९ पूर्वी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचा विश्वासघात करेल. अर्थ खात्याबाबत जय पवार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या विधानातील तफावतीवरून त्यांनी भाजपच्या दबावाकडे लक्ष वेधले आणि केंद्रात मंत्रिपदे देताना मराठी माणसाऐवजी ‘गुजरात कनेक्शन’ला महत्त्व दिले जाण्याची शक्यता वर्तवली,.

अधिक वाचा  Pune Municipal Corporation Election : पुण्यात महायुती आणि दोन्ही राष्ट्रवादी या दोन्ही मोठ्या आघाड्यांमध्ये बिघाडी : चुरशीची आणि बहुरंगी लढत होण्याची शक्यता

विमान अपघाताच्या तपासाबाबत रोहित पवार यांनी अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाचे एकूण १०० पुरावे असून, त्यातील ५० पुरावे त्यांनी आधीच सार्वजनिक केले आहेत. ‘व्हीएसआर’ कंपनीचा या अपघाताशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सांगितले की, या कंपनीकडे इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित असे उपकरण आहे जे विमान किंवा ड्रोन पाडू शकते. या कंपनीला सत्तेतील मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याचा आरोप करत त्यांनी आपले बंधू पार्थ पवार यांना डिफेन्स कमिटीच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करण्याची विनंती केली,. यावेळी त्यांनी सीआयडीच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. सीआयडी सध्या महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोडून अवैध दारू शोधण्याच्या कामात गुंतली असल्याचा टोला त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला. सरकारने ३० जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप काहीही झालेले नाही. सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे ७० टक्के शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून, या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नीट परीक्षेच्या गोंधळावरून त्यांनी सीबीआयच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपच्या या सर्व कारवायांविरोधात जनतेमध्ये उद्रेक निर्माण होऊन येत्या काळात लोक नवीन चेहऱ्यांना संधी देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अधिक वाचा  जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत, उलट मीच तापट स्वभावाचा: का म्हणाले असे अजित पवार?

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love