शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार (सरगना) आहेत हे मी ‘डंके की चोट पर’ सांगतो- अमित शहा

शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार
शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार

पुणे(प्रतिनिधि)—शरद पवार यांनी देशात भ्रष्टाचार रुजवला आणि त्याला संस्थात्मक भ्रष्टाचाराचे स्वरूप दिले. शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार (सरगना) आहेत हे मी ‘डंके की चोट पर’ सांगतो अशी खरमरीत टीका भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. भाजप सतेत येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं तर शरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षण जातं असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असेल,असे मोठे वक्तव्य करत राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे संकेत दिले.

पुण्यातील बालेवडी येथे आयोजित भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात शहा बोलत होते.

अमित शहा म्हणाले, विरोधक भ्रष्टाचारची गोष्ट करतात परंतु, देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार (सरगना) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलं आहे तर ते शरद पवार यांनी केलं आहे. मी डंके की चोट पे सांगत आहे”, असा घणाघात अमित शाह यांनी केला.

पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल

आम्ही २०१४ ला मराठा समाजाला आरक्षण दिलं. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं”, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

“मी आज शरद पवारांना सांगायला आलोय, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व उत्तर देत आहेत. पण माझं लांबून एक निरीक्षण आहे, ते मी आता तुमच्यासमोर सांगत आहे, महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार येतं, मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्या आघाडीचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं. मी विचार करुन हे वाक्य बोलत आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपचं सरकार आलं. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं. मध्यंतरी शरद पवार यांचं सरकार आलं, मराठा आरक्षण गायब झालं. आम्ही पुन्हा आलो. आम्ही आतासुद्धा मराठा आरक्षण देण्याचं काम केलं आहे. शरद पवार यांचं सरकार येईल, तेव्हा मराठा आरक्षण पुन्हा गायब होईल. मराठा आरक्षण कायम ठेवायचं असेल तर कुणाचं सरकार आणलं पाहिजे? समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम भाजपने केलं आहे”, असे शहा म्हणाले.  लोकसभा निवडणुकीची सर्व कसर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भरून काढा. आगामी निवडणुकीमध्ये मोठं यश मिळेल आणि राज्यात प्रंचड बहुमतात युतीचे सरकार येईल, असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी शरद पवारजी माझा कार्यकर्ता हुशार झाला आहे. त्याला तुमच्या खोट्या प्रचाराची जाणीव झाली आहे. आता तुमचा खोटा प्रचार चालणार नाही. घरोघरी जावून या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करायचा आहे. हे खोटं बोलणार आणि भ्रम निर्माण करतील. प्रत्येक कार्यकर्ता हा कमळासाठी समर्पित व्हावा. प्रत्येक कार्यकर्त्याने कमळाला जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी”, अशा सूचना अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅनक्लबचे नेते - अमित शहा
अधिक वाचा  पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल- अमित शहा
अधिक वाचा  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार असेल -अमित शहा : मुख्यमंत्री भाजपचा असण्याचे दिले संकेत
100% LikesVS
0% Dislikes

Spread the love