पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र हे देशातील फलोत्पादनाचे मुख्य केंद्र (Major Center for Horticulture) आहे. इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवून या क्षेत्रात प्रगती केली आहे. फलोत्पादनासाठी रोपवाटीकेतून मिळणारे रोप रोगमुक्त असावे आणि शेतकऱ्यांना लाभ देणारे असावे यासाठी ‘क्लिन प्लांट’ (Clean Plant) कार्यक्रम देशात राबविण्यात येईल. शेतकऱ्यांची गरज आणि क्षमता लक्षात घेवून देशात यासाठी ९ केंद्रे उभारण्यात येतील आणि त्यातील ३ केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येतील अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan) यांनी पुण्यात केली. या तीन केंद्रांपैकी द्राक्षाचे केंद्र पुणे येथे (Grape Center in Pune), संत्र्यासाठी नागपूर येथे (Orange Center in Nagpur) आणि डाळींबासाठी सोलापूर येथे (Pomegranate Center in Solapur) सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी एकूण ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
पहिल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’ (Pune Agri Hackathon) च्या पारितोषिक वितरण आणि समारोप सभारंभात ते बोलत होते. कृषी महाविद्यालय येथील सिंचन नगर मैदान (Sinchannagar Maidan) येथे आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Minister of Higher and Technical Education Chandrakant Dada Patil), कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Adv. Manikrao Kokate), रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Minister of Employment Guarantee Scheme, Horticulture Bharat Gogawale), कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी (Vikas Chandra Rastogi), कृषी आयुक्त सूरज मांढरे (Suraj Mandhare), प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी (Kavita Dwivedi), जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi) आदी उपस्थित होते.
शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘क्लिन प्लांट’ या कार्यक्रमांतर्गत आधुनिक रोपवाटीका उभारण्यात येतील आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना चालविण्यासाठी या रोपवाटिका देण्यात येतील. मोठ्या रोपवाटिकेसाठी ३ कोटी रुपये आणि मध्यम आकाराच्या रोपवाटिकेसाठी दीड कोटी रुपये देण्यात येतील. यातून दरवर्षी ८ कोटी रोगमुक्त रोपे शेतकऱ्यांना मिळतील. या केंद्राच्या आधारे महाराष्ट्राचे फलोत्पादन क्षेत्र जगात आघाडी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृषी वैज्ञानिक आणि शेतकऱ्यांच्या समन्वयातून नवी कृषी क्रांती शक्य
शेतकऱ्याची शेती लाभाची शेती करण्यासाठी उत्पादन वाढवावे लागेल, उत्पादन खर्च कमी करावा लागेल. नैसर्गिक आपत्तीत कृषी मालाच्या संरक्षणासाठी उपाय करावे लागतील. देशातील अनेक प्रयोगशाळेत या संदर्भात संशोधन करण्यात येत आहे. हे संशोधन शेतीच्या बांधापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. देशातील १६ हजार कृषी वैज्ञानिक (Agricultural Scientists) आणि शेतकरी (Farmers) यांचा समन्वय झाल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. अनेक शेतकरी स्वत: नवे प्रयोग करून उत्पादकता वाढवित आहे. अशा शेतकऱ्यांचा देशपातळीवर सन्मान करण्यात येईल. उपक्रमशील, प्रगत शेतकरी आणि कृषी महाविद्यालय एकत्र आल्यास शेती क्षेत्रात वेगाने प्रगती होऊ शकेल. ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून या दिशेने चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. शेतीत अनेक नव्या संधी असून नव्या पिढीने नवतंत्रज्ञान आणि स्वत:च्या बुद्धीमत्तेचा उपयोग करीत या क्षेत्रात नवे स्टार्ट अप (New Start-ups) सुरू करावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर चांगले उत्पादन देणारे वाण उपयोगात आणण्याचा विचार करावा, असेही चौहान म्हणाले.
कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे गरजेचे – देवेंद्र फडणवीस
वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन (Incubation) करणे आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी यावेळी केले.
फडणवीस म्हणाले, शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आहे आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत उन्नत तंत्रज्ञानाचा वापर (Use of Advanced Technology) करणे महत्वाचे आहे. हॅकॅथॉनमध्ये मांडलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जलसिंचन (Irrigation), पीक काढणी (Crop Harvesting), पिकांवर फवारणीचे तंत्रज्ञान (Crop Spraying Technology), एआय कंन्ट्रोल रोव्हर्स (AI Controlled Rovers), कीड व्यवस्थापनात मशिन लर्निंगचा उपयोग (Use of Machine Learning in Pest Management), शेल्फ लाईफ वाढविणारे ड्रायर्स (Shelf-Life Enhancing Dryers), शेतमालाचे प्राण्यांपासून संरक्षण (Protection of Farm Produce from Animals), काढणी पश्चात प्रक्रियेचे तंत्रज्ञान (Post-Harvest Processing Technology) आदी उत्कृष्ट प्रकारचे तंत्रज्ञान इथे मांडण्यात आले आहे. हे उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे उत्तम उत्पादनात रुपांतर करून ते बाजारापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन कृषी महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्रे तयार करावीत आणि या तंत्रज्ञानांचे व्यावसायिक उत्पादनाच्या रुपात विकसीत करून शेतकऱ्याला लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
‘क्लिन प्लांट’ इनिशिएटीव्ह आणि क्रॉप कव्हरसाठी प्रयत्न
मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या फलोत्पादन निर्यातीत (Horticultural Exports) महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या क्लिन प्लांट इनिशिएटीव्हमधील अधिकधिक केंद्र महाराष्ट्राला द्यावे. वातावरण बदलामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने असे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर भाज्या आणि फळांच्या नुकसानीपासून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी क्रॉप कव्हर (Crop Cover) असणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य शासन मिळून क्रॉप कव्हरच्या क्षेत्रात योजना आणता आली तर राज्य सरकारची सकारात्मक भूमिका राहील.
हॅकॅथॉनमधील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
कृषी विभागाने राज्यातील विविध भागात असे हॅकॅथॉन आयोजित करावे अशी सूचना करून फडणवीस म्हणाले, देशातील सर्वाधिक ३० ते ३२ टक्के स्टार्टअप्स (Startups) कृषी क्षेत्राशी निगडीत आहे आणि त्यातील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. विविध कृषी आधारित स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्री हॅकॅथॉनसारख्या उपक्रमाची गरज आहे. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील ही क्रांती अशाचप्रकारे पुढे नेली तर शेती क्षेत्रातील प्रश्न दूर करून शेती उत्पादकता वाढवून शेतकऱ्याच्या फायद्याची शेती करता येईल. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमध्ये प्रदर्शित शेती क्षेत्रातील बदल परिसरातील शेतकऱ्यांना दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.
अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोहोचवा – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य शेती क्षेत्राने केले. त्यामुळे या क्षेत्राला बळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अलिकडच्या काळात निसर्गाचा असमतोल (Imbalance of Nature), मनुष्यबळाची कमतरता (Shortage of Manpower), वाढता खर्च (Increasing Expenses), पाण्याची उपलब्धता (Water Availability) आदी कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि वेळेत जास्त उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवावे लागेल. शेतकऱ्यांच्या फायदेशीर शेतीला दिशा देण्याचे कार्य पुणे ॲग्री हॅकॅथॉनने केले आहे. यापुढील काळात विविध ठिकाणी असे उपक्रम राबविण्यात येतील. हॅकॅथॉनमध्ये नवे तंत्रज्ञान, नव्या कल्पना मांडण्यात आल्या. हे नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचे कार्य शासन, कृषी विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, शेती सर्वांनी मिळून करायचे आहे. हॅकॅथॉनमध्ये विजेत्यांनी सादर केलेल्या तंत्रज्ञानाच्या वापरात सातत्य ठेवावे, शेतकऱ्यांशी नाते जोडून नवनवे प्रयोग करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सुपर ज्युरी, ज्युरी टीम आणि नॉलेज पार्टनर संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे ॲग्री हॅकॅथॉन मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप, नवोद्योजक आणि उपक्रमशील शेतकरी यांना कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), मृदा, सिंचन आणि मृदा आरोग्य व्यवस्थापन (Soil, Irrigation and Soil Health Management), कृषी यांत्रिकीकरण (Agricultural Mechanization), फर्टीगेशन आणि रोग कीड व्यवस्थापन (Fertigation and Pest and Disease Management), पीक काढणी उत्तर तंत्रज्ञान आणि अवशेष व्यवस्थापन (Post-Harvest Technology and Residue Management), कृषी अर्थशास्त्र बाजार जोडणी (Agricultural Economics Market Linkage), इतर कोणतीही नवकल्पना या विभागातील विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
चौकट: शेतकऱ्यांचे नाविन्यपूर्ण प्रयोग प्रेरणादायी: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणवर्ग अत्यंत ‘इनोव्हेटिव्ह‘ (Innovative) असल्याचे पत्रकारांशी बोलताना नमूद केले. ते म्हणाले की, येथील शेतकरी नवीन पद्धतींनी शेती करत आहेत आणि अनेक यशस्वी प्रयोग राबवत आहेत. त्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे उदाहरण दिले, जे द्राक्षे लगेच न विकता, ती कोल्ड स्टोरेजमध्ये (Cold Storage) ठेवून नंतर त्यांची ग्रेडिंग (Grading), सॉर्टिंग (Sorting) करून निर्यात करत आहेत, ज्यामुळे त्यांना चांगला भाव मिळत आहे. सेंद्रिय पद्धतीने भुईमूग शेतीचे यशस्वी प्रयोग (Successful Experiments of Organic Groundnut Farming), तसेच आंबा आणि फुलांची मोठ्या प्रमाणावर होणारी निर्यात (Large Scale Export of Mangoes and Flowers) त्यांनी पाहिली. मिरची शेतीमधील नावीन्यता (Innovation in Chili Farming) ही त्यांनी अनुभवली. हे सर्व प्रयोग महाराष्ट्राचे शेतकरी केवळ उत्पादन वाढवत नाहीत, तर बाजारपेठेतील मागणीनुसार मूल्यवर्धनही (Value Addition) करत असल्याचे दर्शवतात, असे कृषिमंत्र्यांनी नमूद केले.
चौकट: रासायनिक खतांचा अतिवापर आणि दुष्परिणाम
अनेकदा शेतकरी अनावश्यकपणे रासायनिक खते (Chemical Fertilizers) वापरतात, ज्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते आणि नफ्यात घट येते. एका शेतकऱ्याने वापरले म्हणून दुसराही वापरतो, किंवा खासगी दुकानदारांच्या सांगण्यावरून लोक अनावश्यक औषधे वापरतात, असे त्यांनी निदर्शनास आणले. रासायनिक खतांच्या अतिवापराने शेतमालाची गुणवत्ता बिघडते आणि आपले कंटेनर परदेशातून परत येतात कारण चाचणीत ते नापास होतात, असे गंभीर परिणाम केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना अधोरेखित केले. त्यांनी शेतकऱ्यांना गरज असेल तेवढेच आणि आवश्यक तेवढेच रासायनिक खत वापरण्याचे आवाहन केले.